राज्य महामार्ग क्रं ९ च्या दुरावस्थेने जनता झाली त्रस्त, अपूर्ण कामाने लोकांमध्ये नाराजी

प्रतिनिधी:- चेतन एस. चौधरी

नंदुरबार:- राज्य महामार्ग क्रं ९ धानोरा-खांडबारा च्या दुरावस्थेने नागरिक त्रस्त झाले आहेत. पूर्ण रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
धानोरा ते खांडबारा हा गुजरात राज्याला जोडणारा प्रमुख रस्ता असून लहान मोठ्या वाहनांची प्रचंड वर्दळ असते. गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यावर खुप प्रमाणात खड्डे निर्माण झाले असून वाहन चालविणे जिकरीचे ठरत आहे. काही दिवसांपूर्वी या रस्त्याच्या दुरुस्तीला मुहूर्त मिळाला होता. काही अंतराचे काम ही सुरू झाले होते. परंतु पुन्हा काम बंद झाले आहे.
या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे