
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धा येथील विद्यार्थी तर्फे पिपरी मेघे येथे पथनाट्य चा माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली त्यावेळेस लोकांना मतदानाचे महत्व काय आहे आपलाला भारतीय संविधानाने 18 वर्ष पूर्ण झाले की अधिकार दिला तो आपण आपला हक्क गाजवला पाहिजे कारण आपल्याला स्वतंत्रपणे आपला प्रतिनिधी आपल्याला निवडत्या येते आपण मतदानाचा दिवशी मतदान केले च पाहिजे आपण या देशाचे योग्य निर्णय प्रक्रियेद्वारे देशाला प्रगतीच्या वाटेवर पुढे नेता यावे यासाठी जनतेने निवडलेले प्रतिनिधी सक्षम असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मतदारांनी निर्भयपणे तसेच विचारपूर्वक मतदान करणे तेवढेच आवश्यक आहे.निवडणुकांच्या वेळी कोणत्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी न पडता आपल्या मताधिकाराचा उपयोग करायला हवा.विद्यार्थ्यांनी लोकांना समजून सांगितले त्या वेळेस या ग्रुप चे मार्गदर्शक प्रा डॉ दीपक मगरदे सर लोकेश अनंतराव दिवे मयूर वाघमारे मुकेश इरपाचे मोनिका राजूरकर निकिता लोणकर मोनिका हेले मयुरी निकाळजे पायल येनुरकर इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते.
