
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव ग्रामीण : राळेगाव तालुक्यातील मोजा जागजई येथील शेतकरी प्रवीण जनार्दन वागदे वय ४८ वर्ष राहणार जगजई यांनी गट नंबर ९१/१ मध्ये तूर कापणीसाठी गेले असता दिनांक २५/१/२०२६ रोज रविवारला ला सततच्या नापिकेमुळे व कर्जबाजारी असल्याने आपल्याच शेतात जाऊन विष प्राशन केले. त्यांना यवतमाळ रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी मृत्यू घोषित केले . त्यांचा अंत्यविधीही झाला मात्र २५ जानेवारीला मृत्यू पावलेल्या प्रवीण वागदे याने विष प्राशन करन आत्महत्या केली असताना अजून पावतो महसूल प्रशासन किंवा इतर प्रशासनाचा कोणत्याही अधिकाऱ्याने त्यांच्या घरी जाऊन साधी त्यांच्या मृत्यूची चौकशी सुद्धा केली नाही यावरून प्रशासन किंवा शासन शेतकरी किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बाबतीत किती जागृत आहे हे दिसून येते
प्रवीण वागदे हे गेल्या चार वर्षापासून नैसर्गिक आपत्तीने पिकाची नासाडी झाल्याने कर्जाच्या विवचनेत विचार करत नैराश्य मनात धरून रहात असल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले आहे. या नैराश्यामुळे कर्जबाजारीपणा तथा सततची नापिकी त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली . मृत्युपच्यात त्यांच्या पाठीमागे पत्नी व दोन मुली आहे. दोन्ही मुली सध्या शिक्षण घेत आहे कुटुंबाचा कर्ता आधारस्तंभ गेल्याने वागदे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र आत्महत्येची प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी साधी दखल सुद्धा घेतली नाही . तलाठी ,मंडळ अधिकारी यासारख्या स्थानिक स्तरावरच्या अधिकाऱ्याने सुद्धा त्यांच्या घरी जाऊन या परिवाराची चौकशी न करणे याची शोकांतिका आहे तरी सदर शेतकरी आत्महत्येची शासनाने दखल घेऊन चौकशी करून संबंधित परिवाराला मदत करावी अशी गावकऱ्याची मागणी होत आहे.
