राज्यात विकेंड लॉकडाऊन ,ठाकरे सरकारचा निर्णय

राज्यात कोरोनाचा कहर सुरूच असून दररोज सुमारे 45 हजार नवीन कोरोना रुग्ण आढळत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत हा लॉकडाऊन असेल असं मलिक यांनी सांगितले आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विकेंड लॉकडाऊचा निर्णय घेण्यात आला असून शनिवार रविवार लॉकडाउन होणार आहे अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.