
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर
आगामी काळात उन्हाळ्याची दाहकता लक्षात घेता शहरातील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे व पाण्याची कपात करण्यात येऊ नये या मागणीना घेऊन आज दुपारी ३ वाजता चंद्रपूर महानगरपालिकेवर यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. जैन भवन परिसरातील यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयापासून हा मोर्चा निघणार असून सर्व यंग चांदा ब्रिगेडचे महिला व पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
