
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
दि. 8 नोव्हेंबर ला स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटने च्या वतीने आयोजित जाहीर सभेत बोलताना अँड वामनराव चटप यांनी देशातील सरकार कोणत्याही पक्षाचे सरकार आले, तरी शेतीमालाचे भाव पाडून शेतक-यांची लुट थांबलेली नाही, उलट ती वाढली आहे, तर सामान्य नागरिकां वर कर लादून त्यांची ही लुट सरकार करीत आहे. देशावर आणी राज्यावर मोठ्या प्रमाणात कर्जाचा डोंगर उभा केला आहे. नोकर भरती जवळपास बंद आहे. उद्योग, व्यवसाय बंद पडत आहे. सर्व पक्षांचे सरकार चा अनुभव घेतला आहे. या सर्व सरकारांनी लुटीची व्यवस्था बंद केली नाही उलट ती वाढविली तेव्हा खुला बाजाराच स्वातंत्र, शेतीत तंत्रज्ञानाचे स्वातंत्र, बळीराज्य विदर्भाची निर्मीती ची हमी देणा-या स्वतंत्र भारत पक्षाला मजबूत करा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते व स्वतंत्र भारत पक्षाचे माजी अध्यक्ष, विदर्भ आंदोलन समीती चे नेते अॅड वामनरावजी चटप साहेब यांनी केले आहे.
या सभेत बोलताना स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री मधुसूदन हरणे यांनी कमीत कमी कर, खुला व्यापार, सरकारी लायसन्स, परमीट मुक्त बाजार, उद्योग, व्यवसाय, कमीत कमी कायदे, जलद न्याय, रोजगारक्षम शिक्षण, योग्य आरोग्य सुविधा देणारा विचार असलेला व 2003 च्या मुंबई अधिवेशनात ” बळीराज्य विदर्भाची हमी देणा-या स्वतंत्र भारत पक्षात युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री मधुसुदनजी हरणे यांनी केले.
सभेत शेतकरी संघटना राज्य कार्यकारणी सदस्य श्री विजयराव निवल यांनी सरकारने कडधान्याची आयात करून तुर, चना, मुग, उडीद चे भाव पाडले, तर सोयापेंड आयात करून, साठेबंदीचा निर्णय घेवून सोयाबीन चे बाजारभाव पाडले आता कापड लाँबी च्या दबावात येवून निर्यात बंदी करून बाजारात कापसाचे भाव पाडण्याचा निर्णय सरकार केव्हाही घेवू शकते, तेव्हा शेतक-यांनी शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र येऊन, संघर्षासाठी तयार राहावे, असे आवाहन केले.
शेतकरी महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ प्रज्ञाताई बापट यांनी शेतीचे शोषणाची सर्वात जास्त झळ ही शेतकरी महीला ना बसते. महिलांची कठीन कामातून खरी मुक्तता हि तंत्रज्ञानाने केली आहे. शेती, व्यवसायात तंत्रज्ञानाची मागणी करणा-यां शेतकरी महीला आघाडीत महिलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. सभेचे संचालन जिल्हा प्रमुख श्री राजूभाऊ झोटींग यांनी केले, तर आभार प्रदर्शन अक्षयजी महाजन यांनी केले. सभेच्या यशस्वीते साठी श्री इंदरचंद बैद, अक्षयजी महाजन, अनिलराव वनकर, किसनराव पावडे, गोपालराव भोयर,गजाननराव ठाकरे धर्मेंद्रजी कूत्तरमारे, बंडूजी येरगूडे यांनी केले. सभेला खैरी वडकी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
