
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
‘सारे भारतीय माझे बांधव आहेत ‘, ही प्रतिज्ञा लोकशाहीला अभिप्रेत मूल्यांची रुजवनुक व्हावी म्हणून आपण स्वीकारली. पण ती आपल्यात रुजली का आणि आपल्या वर्तवणूकीत त्याचे प्रतिबिंब उमटते का याचे उत्तर बहुदा नकारातमक येते. आजही वाड्या -वत्सातील अनेक जमाती उपेक्षेच्या शिकार ठरल्या आहे. राळेगाव तालुक्यातील गोपालनगर पारधी बेडा पाहिला कीं याचा प्रत्यय येतो. पिण्याच्या पाण्याकरिता येथील पारधी बांधवाची वणवण संपायचे नाव घेत नाही. गुन्हेगारी जमात ही मानसिकता आजही त्यांचा पिच्छा सोडण्यास तयार नाही. अनेक समस्या आहेत पण कुणी लक्ष दयायला तयार नाही.
तालुक्यातील आदिवासी बहुल व संपूर्ण पारधी समाज असलेले साडेचारशे लोकसंख्येचे असलेले गोपालनगर हे गावं. ४५ अंश तापमानात पाण्यासाठी पायपीट करीत आहे . कोणत्याच योजनांची प्रभावी अंलबजावणी या ठिकाणी होतं नाही. कागदोपत्रि खर्चाचे आकडे लाखोत असतील प्रत्यक्षात मात्र स्थिती विदारक आहे. श्रीरामपूर कोदुर्ली गोपालनगर गटग्रामपंचायत आहे . यातच गोपालनगर मध्ये शंभर टक्के पारधी समाज आहे . विकासा पासून कोसो दूर असलेल्या गोपालनगर मध्ये काही उच्च विद्याविभूषीत तरुण देखील आहेत नाही असे नाही . मात्र यांच्या प्रति असणारा दूषित पूर्वग्रह दृष्टिकोन यांच्या विकासाच्या आड येतं आहे.
शिक्षण, आरोग्य, जाणीवजागृती, आर्थिक हलाखी या मुद्यावर इथे मोठे कामं करण्याची गरज आहे. अशिक्षितपणा, व्यसनाधिंनता, यातून फोफावलेला अवैध दारूचा व्यवसाय व पोलिसांच्या सतत च्या धाडी. यात सर्वांनाच गुन्हेगार ठरवन्याचा अघोषित मापदंड या मुळे यांचे जगणेही मुश्किल झाले आहे.
मानवीय दृष्टीकोनातून पाहण्यापेक्षा यांना गुन्हेगार म्हणून पाहण्याची जी एक चुकीची परंपरा निर्माण झाली ती यांच्या विकासाच्या आड येतांना दिसते. साधे पिण्याचे पाणी देखील यांना मिळू नये अशी स्थिती त्यामुळेच निर्माण झाली.
गोपालनगर गावाला पाणी पुरवठा करणारी योजना पाचवर्षापूर्वी कार्यान्वित झाली . छोटया मोठ्या समस्येने पाणी पुरवठा खंडीत होतो .सद्य स्थितीत पाणी पूरवठा करणारी यंत्रणा नादुरस्त आहे . याला कारण शुल्लक आहे . विहीरी वरून पाणी पुरवठा गावात होतो गावांत पाणी देण्याची व्यवस्था करणारा व्हॉल अज्ञात व्यक्ती ने फोडला या घटनेला एकमहिना झाला सरपंच व ग्रामसेवकाला माहिती दिली त्यांनी थातूरमातूर चौकशी केली निष्पन्न काहीच झाले नाही. एक हॅन्डपम्प आहे पण या ठिकाणी पाणी कमी व वादच अधिक होतात. येत्या दोनदिवसात व्हॉलची दुरुस्ती करुन पाणी पुरवठा सुरळीत सुरू झाला नाही तर आम्ही पंचायत समिती समोर उपोषणाला बसल्या शिवाय राहणार नाही असा ईशारा पवन पंजाबराव पवार , सोमनाथ पवार, पंकेश पवार, विठ्ठल पवार, प्रकाश फुलमाळी , सुखदेव पवार, श्रावण काळे, कांलींदा काळे, सागर फुलमाळी , गणेश पवार या ग्रामस्थानी दिला आहे .
पारध या शब्दा पासुन , पारधी या शब्दाची उत्पत्ती झाल्याचा संदर्भ सापडतो. पारध चा अर्थ होतो शिकार. अर्थात शिकार करणारी जमात म्हणजे पारधी. धावण्यात पटाईत असल्याने यांना चिता पारधी म्हणूनही राज्यांच्या सैन्यात एके काळी सन्मानाचे स्थान होते. शिवरायांच्या सैन्यात देखील पारधी बांधव होते. पेशवाईत ते इतरत्र विखुरले आणि त्यांनी जँगलाचा आधार घेतल्याची वदंता आहे. त्यांच्या चेहऱ्याची सुबक ठेवणं, त्यांची नावे त्यांचा इतिहास उज्वल असण्याची साक्ष देतातं. मात्र आधुनिक युगात कुणी राजकीय गॉडफादर नाही, मतदार संघावर प्रभाव पडेल अशी दखलपात्र संख्या नाही. या मुळे त्यांच्याकडे कुणी लक्ष दयायला तयार नाही. अशी स्थिती आहे.
