राळेगांव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगांव मधील तीन जिल्हा परिषद गटाचे आरक्षण सर्व राजकीय पक्षांच्या इच्छुकांच्या अपेक्षे पेक्षा जास्त चं मस्त निघाल्या ने सर्व इच्छुक जाम खुश झाले आहेत.
०७ जळका जिल्हा परिषद गट हा नागरिकांचा मागास वर्ग (ओ.बी.सी.)साठी, ०८ खैरी जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण साठी, तर ०९ झाडगांव जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण साठी आरक्षित निघाल्या ने इच्छुक कार्यकर्ता मंडळी पेक्षा अजून ही पद लालसा असलेल्या प्रमुख नेते मंडळी ना आतून खूप मोठ्या आनंदाच्या उकळ्या फुटत असल्याचे “फेस रिडींग” वरुन जाणवतं आहे हे विशेष.
तीन जिल्हा परिषद गटाची जळका सोडून फक्त नावं बदलली.सर्व संरचना,त्या मधील गावं जैसै थे च आहे. वरध जिल्हा परिषद गटाचे नाव झाडगांव तर वडकी जिल्हा परिषद गटाचे नाव खैरी एवढाच काय तो बदल करण्यात आला आहे.
मागील पंचवार्षिक मध्ये भाजपाला जिल्हा परिषद तीन गटातून दणदणीत विजय पदरात पडला, फक्त सक्षम,आर्थिक दृष्ट्या व जातीय निहाय समीकरणात बसणारे उमेदवार मिळाल्या मुळे म्हणा की ऐनवेळी इतर राजकीय पक्षां कडून आयात केल्या मुळे विजयश्री मिळाली होती. काँग्रेस पक्षात असलेल्या मोठ्या गटबाजी चा मोठा लाभ भाजपा ला आयता च मिळाला होता.
या वेळी मात्र परिस्थिती जरा काँग्रेस आणि भाजपा साठी निराशाजनक च दिसत आहेत. मुख्य कारण म्हणजे ते च ते चेहरे. वयाची पासष्टी ओलांडली तरी सत्तेचा, खुर्ची चा मोह मात्र सुटत नसल्या ने नवतरुण मग तो अपक्ष असो की राजकीय पक्षांचा तो ऐनवेळी बाजी मारेल अशाच चर्चा गावपातळीवरुन ऐकावयास मिळत आहे. दोन गट सर्वसाधारण तर एक गट ओ.बी.सी.साठी आरक्षित निघाल्याने,अनुसूचित जाती जमाती मधुन इच्छुक उमेदवारांचा मोठा हिरमोड झाला आहे. कारण आता कोणताही राजकीय पक्ष यांना विचारात घेणार नाही. काँग्रेस पक्षात तिकीट मिळेल की नाही याची शाश्वती दुसऱ्या फळीच्या नेत्यांना अजिबात नाही. भाजपा मध्ये ही जवळपास हीच परिस्थिती शेवटच्या क्षणी दिसू शकतेय. सध्या राळेगांव तालुक्यात शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,मनसे चा देखील जनाधार भरभक्कम वाढलेला आहे,याची प्रचिती नुकत्याच संपन्न झालेल्या सोसायटी व नगर पंचायत राळेगांव च्या निवडणुकीत आली आहे.अजून ओबीसी आरक्षणाचे “फुल ॲन्ड फायनल” झाले नाही त्या नंतर चित्र अजूनही वेगळे च राहील यात शंकाच नाही हे विशेष…
