सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव खंड एक मधील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी वार्हा रोडवरील बेंबळा कॅनॉलच्या दुरुस्तीची मागणी कार्यकारी अभियंता, बेंबळा विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या चार वर्षांपासून या भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
रस्ता दुरुस्ती अभावी शेतीच्या दैनंदिन कामकाजात मोठ्या अडचणी येत असून, शेतमाल वाहतूक, पीक देखभाल आणि शेतीशी संबंधित इतर महत्त्वाची कामे करणे कठीण झाले आहे. त्यामुळे बेंबळा कॅनॉलची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले की, जर लवकरात लवकर कॅनॉलची दुरुस्ती करण्यात आली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
