


प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर
जमनजट्टी, माना-लालपेठ परिसर परिसर वन्यप्राणीमुक्त करण्यास स्वच्छता वेकोलीकडून करवून घ्या
मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे यांची विभागीय वनाधिकारी यांचेकडे मागणी
चंद्रपूर/ प्रतिनिधी:
मागील अनेक दिवसांपासून माना-लालपेठ परिसरात अस्वलीचा वावर सुरू आहे. पठाणपुरा गेटबाहेर या वेकोलिच्या ओवरबर्डन परिसरातील झाङेझुङपे तातङीने काढण्यास वेकोलीकडून ही कामे तात्काळ करवून घेण्याची मागणी विभागीय वनाधिकारी सारिका जगताप यांच्याकडे इको-प्रोचे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक बंङू धोतरे यांनी केली आहे.
पठाणपुरा गेटबाहेर जमनजट्टी परिसरात सकाळी मॉर्निंग वॉककरिता नागरिक येत असतात. नागरिकांची मोठी गर्दी असते, परिसरात वन्यप्राणीचा वावर धोकादायक आहे. याच वेकोलीच्या ओव्हर बर्डनवर 2013 मध्ये तीन बिबट पकडण्यात आलेले आहे. मागील वर्षभरात माना परिसरात वाघाचा वावर सुद्धा दिसून आलेला आहे.परिसरात वाढलेले काटेरी बाभळीचे झुडूप यास कारणीभूत ठरत आहेत. बाबळीचे कत्रिम जंगल तयार झाले आहे, येथे वन्यप्राणी अधिवास निर्माण होत आहे. वेकोलिकडून त्यांच्या क्षेत्रातील वन्यप्राणी दृष्टीने संवेदनशील क्षेत्र परिसरात दरवर्षी सदर परिसर स्वच्छ करण्याची गरज असताना, रोड च्या दुतर्फा कायम स्वच्छता ठेवणे गरजेचे असताना सुद्धा याकडे दुर्लक्ष होत आहे. येथे वन्यप्राणी वावर असल्याने याकडे सतत देण्याची लक्ष आहे. वनविभागाच्या वतीने त्वरित कार्यवाही करीत वेकोली कडून स्वछता आणि झुडुपे काढण्याची कामे करवून घ्यावी, अशी मागणी इको-प्रोचे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक बंङू धोतरे यांनी विभागीय वनाधिकारी सारिका जगताप यांच्याशी चर्चा करताना केली.
दरम्यान आज सुनील लेनगुरे नामक व्यक्ती अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झाला. इको-प्रोच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाणून प्रकृतीची विचारपूस केली. इको-प्रो चे वन्यजीव विभाग प्रमुख नितीन बुरडकर, अनिल अडगूरवार, प्रमोद मलिक, सचिन धोतरे यांचा समावेश होता.अशा घटनांवर आळा घालण्यासाठी नेहमीच वनविभाग, टायगर सेल, जिल्हानप्रशासन कडून च्या विविध बैठकीत सूचना देऊन कार्यवाही होत नसल्याची टीका मानद वन्यजीव रक्षक धोतरे यांनी केली आहे. अगदी पहाटे पठाणपुराबाहेर फिरायला सध्या परिस्थितीत जाणे टाळावे, स्वतःची सुरक्षा लक्षात घेऊन परिसर स्वच्छ होईस्तोवर परिसरात मॉर्निंग वॉक करू नये असे आवाहन मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे यांनी केले आहे.आवश्यकता असल्यास सदर जखमी व्यक्तीवर प्लास्टिक सर्जरी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.नुकतेच जिल्ह्यातील मानव-वन्यप्राणी संघर्ष वर अभ्यासगट तयार करण्यात आलेला होता. या गटाचा सदस्य म्हणून यात अस्वलीचा हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींना चेहरा विद्रुप होतो, कायम तसेच पुढे जीवन जगावे लागत असल्याने, त्यामुळे अश्या जखमी व्यक्तीवर तात्काळ प्लास्टिक सर्जरी करण्याची गरज असते, असे मत नोंदविण्यात आलेले आहे.
