नगराध्यक्ष अहतेशाम अली यांच्यावर कारवाई करा अन्यथा मनसेचे कायदेभंगआंदोलन होणारच.

सहसंपादक:प्रशांत बदकी
वरोरा शहरात लॉक डाऊन चे कडक निर्बंध असताना काही दुकानदारांनी आपली दुकाने सुरू ठेवल्यानंतर तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी अशा दुकानदारांना धडा शिकविण्यासाठी आज त्यांच्या दुकानाला सील ठोकले होते, मात्र सत्तेचा दुरुपयोग करून नगराध्यक्ष अहतेशाम अली यांनी त्या दुकानदारांना पाठिंबा देत तुम्ही सील तोडा आम्ही तुमच्या सोबत आहो असे म्हणून त्यांना तहसीलदारांच्या आदेशाने सील लावले होते ते तोडले नगराध्यक्ष अहतेशाम अली यांनी कायदा हातात घेत तालुका न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाची अवहेलना केली आहे .कायदा तोडणाऱ्या नगराध्यक्ष अहतेशाम अली यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी मनसेचे तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांनी केली आहे.
लॉक डाऊन च्या काळात अनेक दुकानदारावर प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली तेंव्हा नगराध्यक्ष अहतेशाम अली कुठे गेले होते? असा सवाल करून सत्ताधारी लोकप्रतिनिधी जर कायदा हातात घेऊन अशा प्रकारे न्यायपालिका व्यवस्थाच पायदळी तुडवत असेल तर मग कायदा हा फक्त सर्वसामान्य जनतेसाठीच आहे का? असा प्रश्न उभा राहतो त्यामुळे या प्रकरणी प्रशासनाने नगराध्यक्ष अहतेशाम अली यांच्यावर त्वरित कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सविनय कायदेभंगआंदोलन करून शासन प्रशासनाचा निषेध करेल असा इशारा मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांनी प्रशासनाला दिला आहे.
नगराध्यक्ष अहतेशाम अली यांचा मास्क पण गायब?
सर्वसामान्य नागरिकांनी तोंडावर मास्क लावले नाही तर नगरपरिषदेकडून दंड आकाराण्यात येते मग सार्वजनिक स्थळावर जेंव्हा गांधी चौकातील दुकानांवर कारवाई करण्यात आली व त्याचे नंतर सील तोडण्यात आले तेंव्हा मोठी गर्दी उसळली होती तेंव्हा नगराध्यक्ष अहतेशाम अली यांच्या तोंडावर मास्क देखील नव्हते मग त्यांच्यावर दंड कुणी करायचा असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहे.
याआधी देखील काही दुकानदारांची दुकाने सील करण्यात आली होती परंतु तेव्हा नगराध्यक्ष साहेब आले नाही परंतु आज झालेल्या कारवाई नंतरच का हजर झाले असा सवाल सर्वसामान्य दुकानदार विचारत आहे.आज झालेल्या कारवाईत वैशिष्ट्य काय ?
