वेळीच करा कापूस पिकातील आकस्मिक मर व्यवस्थापन करा…..! कृषी तज्ञ विनोद चौधरी.

ढाणकी प्रति.. प्रवीण जोशी,

ढाणकी परिसरात
अतिपावसामुळे कपाशीच्या शेतामधील झाडे, अचानक जागेवर सुकू लागले आहेत. याला अकस्मित मर असे म्हणतात आकस्मित मर मध्ये दीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्या नंतर जमिनीचे तापमान वाढलेले असते अशावेळी पाऊस झाल्यास झाडाला धक्का बसून, अचानक झाड सुकते ,कालांतराने झाडाचे पाने गळतात मोठ्या पावसानंतर ३६ ते ४८ तासात मरची लक्षणे दिसू लागतात कालांतराने झाडे, मरतात त्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते.
१. अतिरिक्त पाण्याचा लवकरात लवकर निचरा करवा.
२. वापसा येताच कोळपणी व खुरपणी करावी.
३. लवकरात लवकर २०० ग्रॅम युरिया+ १०० ग्रॅम पालाश (पोटॅश) + २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १५० मिली याप्रमाणे आळवणी करावी.
किंवा
१ किलो १३:००:४५ + २ ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड + २५० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड २०० लिटर पाण्यातून मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १०० मिली आळवणी करावी.
४. वरील प्रमाणे द्रावणाची आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची माती पायाने लवकरात लवकर दाबून घ्यावी.
वरील सर्व उपाययोजना शेतामध्ये झाडे सुकू लागलेली दिसताच लवकरात लवकर म्हणजे २४ ते ४८ तासाच्या आत कराव्यात जेणेकरून पुढील होणारे मोठे नुकसान वेळीच टाळता येईल.. असे प्रगतिशील शेतकरी विनोद चौधरी यांनी, सांगीतले..