
सहसंपादक : रामभाऊ भोयर
रविवार दिनांक 15 मार्च 2026 रोजी यवतमाळ येथील लॉर्ड बुद्ध हॉल संविधान चौक येथे आजाद समाज पार्टी स्थापना दिवस व मान्यवर कांशीरामजी जयंती आणि क्रांतीवीर शहीद बापूरावजी शेडमाके ह्यांच्या जयंती निमित्ताने कार्यक्रम साजरा करण्यात आला.
डॉ मदन वरघट साहेब ह्यांचा अध्यक्षतेत कार्यक्रमाचे उद्घाटक ओम प्रकाश कांबळे साहेब ह्यांचे हस्ते कार्यक्रमाची सुरुवात बहुजन महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून मान्यवर कांशीरामजी तथा शहीद बापूरावजी शेडमाके ह्यांच्या जयंती निमित्ताने दीपप्रज्वलन व पूजन, पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाला गौतमजी आठवले साहेब रेखाताई थूल तसेच सविताताई मडावी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख वक्ते व अध्यक्ष माननीय डॉ मदन वरघट साहेब ह्यांचा मार्गदर्शनातून सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे महत्व पटवून देतं आझाद समाज पार्टी (कांशीराम) राष्ट्रीय अध्यक्ष भाई अँड. चंद्रशेखर आझाद यांच्या कार्याची दखल आज संसदेत घेतली जाते ते बहुजनांचे उभरते नेतृत्व आहे. त्यांच्या शब्दाला संसदेत मान आहे गोर गरीब मजूर,कष्टकरी, शेतकरी, दिव्यांग, किंव्हा कर्मचारी असो की महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ते ठाम पने सरकार समोर मांडताना आपल्याला दिसतं आहे. बेरोजगारी, शिक्षा. UGC बिल ह्यावर ते संसदेत बोलतांना दिसतं आहे. त्यांचे कार्य बहुजन समाज विकसित व सक्षम करण्यासाठी दिवस रात्र ते झटत आहे.. दोन दा त्यांचे वर गोळीबार होऊन सुद्धा ते आपल्या कर्तव्यापासून तिळमात्र ही दुरावले नाही.. त्यांना आपल्या मृत्यूचे सुद्धा भय नाही ऍड भाई चंद्रशेखर आझाद म्हणतात जीवन एक ही बार मिलता है.. लड के जीलो.. या डरर के जीलो.. लेकीन तय खुद को करना है की हम कैसा जीवन जीए.. वह उदाहरण देते है डॉ बाबासाहेब आंबेडकरजी का जो कहते थे.. 100 दीन बकरी बनकर जिने से अच्छा है एक दीन शेर बनकर जिया जाए.. ताकी दुनिया हमे याद रखे.. ईतिहास सिर्फ बहादुरोंका लिखा जाता है.. बुजदिल कमजोरोंका नहीं.. ह्याचं बाबासाहेबांच्या तत्वावर भाई चंद्रशेखर आझाद आपले हक्क अधिकार आणि सन्मानाचा संघर्ष ते मनुवादी सत्तेच्या विरोधात संसदेत करतं. भाई चंद्रशेखर आझाद हे सामान्य व्यक्ती महत्त्व नसून बहुजनांचा मशीहा म्हणून आज त्यांची ओळख निर्माण झाली आहे आणि ते जोपर्यंत बहुजनांची सत्ता संसदेत काबीज करणारं नाही तो पर्यंत जीवावर उद्धार होऊन संघर्षशील करवा भीम आर्मी (भारत एकता मिशन) आणि आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून लोकांपर्यंत खरी लोकशाही गणराज्य ह्या भारताला देण्याचं कार्य ते आपल्या संघर्षमय जीवनातून करतं आहे.. मी इथे आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की, अश्या प्रतिभावान, निडर, एकनिष्ठ, लढवय्या नेत्याला आपण सर्वांनी सहकार्य, समर्थन द्यायलाच पाहिजे.. असे डॉ मदन वरघट साहेब ह्यांचा मार्गदर्शनातून कार्यकर्त्यांना ते संबोधत होते..
कार्यक्रमाची. प्रस्तावना, सूत्र संचालक आणि आभार प्रदर्शन माजी सैनिक मेजर जीवन कोवे जिल्हा कार्याध्यक्ष यवतमाळ यांनी केलं.. तर स्वगताध्यक्ष म्हणून दिलीपभाऊ वासेकर ह्यांनी स्थान ग्रहण केले..
कार्यक्रमाच्या शेवटी यवतमाळ जिल्ह्यातून आलेल्या 35 कार्यकर्त्यांना पदाधिकारी नियुक्ती पत्र देऊन आझाद समाज पार्टीच्या वतीने रामेश्वर ढगे आर्णी तालुका अध्यक्ष आदी सेल. राहुलभाऊ मुन तालुका संघटक कळंब, आनंद भाऊ जिवने कळंब शहर शाखा उपाध्यक्ष, सविता मडावी वरूड ग्राम शाखा अध्यक्ष म.आ. गौतमभाऊ शेलारे यवतमाळ तालुका संघटक, ओम प्रकाश कांबळे यवतमाळ पूर्व उपाध्यक्ष, रेखाताई थूल यवतमाळ शहर उपाध्यक्ष, म.आ. मेजर जीवन कोवे जिल्हा कार्याध्यक्ष यवतमाळ, ईश्वर फुलमाळी नांझा शाखा संघटक, संजय हिवरकर नांझा शाखा उपाध्यक्ष, नानाजी माघाडे, राहुलभाऊ खडसे कळंब शहर संघटक, रवींद्र भगत नांझा शाखा अध्यक्ष विनायक थूल यवतमाळ तालुका संघटक प्रवीण जवादे वटबोरी शाखा अध्यक्ष उमेश पाटील भारी शाखा अध्यक्ष अशोक लांडगे नर्सापूर शाखा अध्यक्ष नितेश नेहारे मेंढला शाखा संघटक अश्या अन्य नियुक्त्या देण्यात आल्या ..
नियुक्ती नंतर कार्यक्रम समारोप झाला.
