
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी
आजही भारतीय स्टेट बँकेची एटीएम मशीन हे मुख्य ईमारतीमध्ये आहे निवेदन देऊन सुद्धा समस्या मात्र कायमच आहे त्यामुळे ग्राहक मोठे की भारतीय स्टेट बँकेचे प्रशासन मोठे सर्वसामान्य ग्राहकच बँकेचा मालक असतो? त्यामुळे अनेक सुट्टीच्या दिवशी ग्राहक एटीएमच्या सुविधे पासून वंचित राहत असताना याकडे मात्र भारतीय स्टेट बँक शाखा ढाणकीच्या प्रशासनाचे दुर्लक्षितपणा करत असल्याच दिसत आहे. सर्वसामान्य ग्राहकांना सेवा देण्या पेक्षा या ठिकाणी प्रशासन हेळसांड कशी होईल यातच आनंद मानतो? वयोवृद्ध व जेष्ठ ग्राहकांची कदर मात्र स्टेट बँकेला दिसत नाही आर्थिक वर्ष सरत असताना एसएमएस चार्जेस एटीएम चार्जेस सुट्टीच्या दिवशी सुद्धा चार्जेस लावल्या जातात ज्या दिवशीची सुविधा त्या दिवशीचे चार्जेस लावले तर स्टेट बँकेला चालेल का? पण प्रत्यक्षात तसे होत नाही. चार्जेस बारा महिन्याचे आणि सुविधा मात्र देताना त्या पूर्ण स्वरूपात दिल्या जात नाही. बँकेत कोणते काम असले म्हणजे सर्वसामान्य लोकांनी रांगेत उभे राहायचे व मर्जीतील लोकांनी मात्र साहेबांच्या जवळ जाऊन आपले काम करून घ्यायचे अशी सावत्रपणाची भूमिका? ग्राहक ग्राहकच असायला पाहिजे तो श्रीमंत असो किंवा गरीब अथवा आर्थिक व्यवहार लहान मोठा असला म्हणजे काय झालं.व्यावसायिक लोकांना पायघडया आणि आठवड्यातून कधीतरी येणाऱ्या ग्राहाकाला मात्र थांबा.
ज्या ठिकाना वरून रोज ग्राहक बँकेत ये जा करीत असतील तिथूनच शाखा प्रबंधक येत असतील त्यांना ग्राहकांची ही अडचण दिसत नसेल का? की यास “हेतूपुरे सर दुर्लक्षम” म्हनावे लागेल ग्राहक हा मालक असून त्या ठिकाणी काम करणाऱ्या यंत्रनेला आपण जनतेचे नोकरदार आहे याचा विसर पडलेला दिसतो? नोकरदाराने ठरल्या नुसारच वागायचे असताना येथील यंत्रणा खुर्चीची मालक बनली? इकडे ग्राहकांचे उन्हाने हाल होत असताना साहेब मात्र भौतिक सुखात गुंग राहून वातानूकुलीत यंत्राची गारेगार हवा घेत असतील. पण ज्या सर्वसामान्य ग्राहकावरच आपला उदरनिर्वाह चालतो व प्रतिष्ठा मिळते त्याच ग्राहकांना मात्र साधे फिल्टरचेही थंड पाणी प्यायला न मिळणे किंवा दिसू नये अशाच ठिकाणी ठेवणे या पेक्षा कोणते दुर्दैव असावे. एकंदरीत काय “मोले घातले रडाया नाही आसू नाही माया “
रोखपाल साहेबाना ग्राहकांच्या वेळेची मुळीच किंमत नसते तासनतास दूरध्वनीवर बोलत राहायचे आणि किती तरी वेळाने साहेबाचे मनसोक्त मोबाईलवर संभाषण झाल्यानंतर ग्राहकाला त्यांची रक्कम मिळते? कार्यालयाच्या वेळेमध्ये ग्राहकाला ताटकळत ठेवून कितीतरी वेळ दूरध्वनीवर संभाषण साधता येते?याबाबत शाखा प्रबंधक यांनी संबंधित रोखपाल साहेबांना याबाबत सूचना दिल्या? ग्राहकांना उद्धटपणाने बोलून त्यांना अपमानित करण्याचा अनुभव बऱ्याच जणांना आल्याचं सांगण्यात येते.तेव्हा रोखपाल साहेबानी ती खुर्ची वैयक्तिक वडिलोपार्जित संपत्ती न समजता ग्राहकांचे कामे करण्यासाठी आहे हे कोणी सांगावे?
