कापसाच्या भावात घसरण सुरूच मात्र सरकार उदासीन:येत्या १८ मे पांढरकवडा येथे शेतकरी वाचवा आंदोलन

सहसंपादक -रामभाऊ भोयर

एकीकडे महाराष्ट्रातील ८० लाख कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी “पडेल भावात कापुस न विकण्याचे अघोषीत आंदोलनं “मागील ६ महिन्यापासुन सुरु केल्यासही कापसाच्या भावात सतत प्रचंड घसरण होत असल्यामुळे प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असुन आता मायबाप सरकारने महाराष्ट्रातील कापुस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पॅकेज द्यावे या रास्त मागणीसाठी जेष्ठ शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे प्रमुख नगदी पीक व पांढऱ्या सोन्याचे पीक वाचविण्यासाठी “शेतकरी वाचवा आंदोलन येत्या १८ मे पांढरकवडा येथील तहसील चौकातील भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संध्याकाळी ५ वाजता आयोजीत करण्यात आला आहे यापूर्वी हे आंदोलन ३ मे रोजी आयोजीत करण्यात आले होते मात्र प्रचंड अवकाळी पाऊसाने हे आंदोलन पुढे ढकलण्यात आले होते मात्र या दरम्यान कापसाच्या भावात घसरण अधिक वाढल्याने व सरकार या गंभीर विषयावर मौन असल्यामुळे १८ मे रोजी आंदोलन आयोजित करण्यात आले आहे यामध्ये सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा असे आव्हान शेतकरी आंदोलनाचे संयोजक अंकित नैताम ,मोहन मामीडवार ,विजय तेलंगे ,मोरेश्वर वातीले ,प्रेम चव्हाण ,अजय राजूरकर ,रोहन ठाकरे ,सुनिल राऊत,बाळासाहेब जाधव ,रमेश चव्हाण यांनी केले आहे .


महाराष्ट्रातील ८० लाखावर शेतकरी प्रचंड आर्थीक संकटात

मागील वर्षी कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव मिळाल्यामुळे यावर्षी विक्रमी १ कोटी १२ लाख हेक्टर मध्ये कापसाची लागवड करण्यात आली त्यामध्ये संपूर्ण विदर्भ मराठवाडा खांदेश उत्तर महाराष्ट्र सह मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात पेरा करण्यात आला होता सुरवातीला प्रचंड पाऊसाने कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व ७० टक्के पीक सुद्धा नासले मात्र महाराष्ट्रातील ८० लाखावर शेतकरी प्रचंड वाढलेला लागवडीचा खर्च लाऊन जेमतेम ३० ते ४० टक्के कापसाचे उत्त्पन्न घेतले व मागील डिसेम्बरपासून कापसाचे भाव वाढतील या आशेने सर्व कापूस घरी ठेवुन कापसाचे भाव वाढतील या आशेने वाट पाहत आहे मी,तर कापसाचा भाव आता जेमतेम ७५०० रुपयावर अटकला आहे मात्र महाराष्ट्रातील एकमेव नगदी पीक कापसाची दाणादाण ही केंद्र सरकारच्या कापूस उत्पादक शेतकरी विरोधी धोरणामुळे असुन महाराष्ट्राचे मिंधे सरकार सुद्धा या गंभीर विषयावर मौन घेऊन असल्यामुळे येत्या १८ मे ला हजारो केंद्र सरकारने कापूस निर्यात करण्यासाठी प्रति गाढी मागे ३०,००० /- अनुदान जाहीर करावे व मिंधे सरकारने महाराष्ट्रातील ८० लाखावर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ५ हजार रुपये अनुदान जाहीर करावे या मागणी साठी ‘कापसाची होळी सत्याग्रह’ पांढरकवडा येथे रयतांचा राजा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर करणार असल्याची माहीती शेतकरी चळवळीचे कार्यकतें किशोर तिवारी यांनी केली आहे .

महाराष्ट्रात या हंगामात ३३०० कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

यावर्षी कापसाची नापीकी व कापसाचा भाव पडल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात आले आहेत व यातच कर्जबाजारी ३२०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून त्यांची सूद घेण्यासाठी मिंधे सरकारचा एकही मंत्री वा अधिकारी त्यांच्या दारावर गेला नसुन सध्या सर्वच शेतकऱ्यांच्या घरी लाखों क्विंटल कापुस पडला असुन जर कापसाचे भाव असेच पडत राहीले व केंद्र व राज्य सरकार उघडया डोळ्यानी हा तमाशा पाहत राहिले तर निष्पाप शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होतील अशी भीती किशोर तिवारी यांनी व्यक्त केली.

मागील वर्षी ६० लाख गाढीची (बेल) निर्यात तर यावर्षी फक्त २० लाख (बेल) गाढीची निर्यात

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे व भारतातील २ कोटीच्या वर कापूस उत्पादक शेतकऱ्यांची पर्वा नसल्यामुळे तसेच मोदी सरकारचे मंत्री यांनी गिरणी मालकाकडून मोठी रक्कम गोळ्या केल्यामुळे यावर्षी २० लाख (बेल) गाढीची निर्यात तर मागील वर्षी ६० लाख गाढीची (बेल) निर्यात झाली होती या उलट भारत बाहेरील १० लाख बेल भारत सरकारने आयात करण्याची परवानगी दिली आहे यामुळेच या चुकीच्या धोरणामुळे कापूस उत्पादक शेतकरी कंगाल झाले असुन हे सरकार आम्ह्चे सरण रचत असल्याचा आरोप अंकित नैताम ,अजय राजूरकर ,प्रेम चव्हाण ,मोरेश्वर वातीले संतोष बोडेवार अजयभाऊ कट्टेवार यांनी केले आहे .

महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी हा नेहमीच सुलतानी आणि आसमानी संकटाला सामोरे जात असतो. मात्र वर्षी शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे. मिंधे सरकार मात्र जगात नसल्यामुळे आता आंदोलन शिवाय पर्याय नाही १८ मे च्या आंदोलनात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी शामिल व्हावे असे आवाहन गजेंद्रा आष्टेकर ,संतोष नैताम ,अतुल टेकाम ,शंकर अंधारे ,गजानन गोदूरवार यांनी केले आहे.