

झरी तालुक्यातील काही रस्त्यांची अक्षरशा चाळण झाली असून वाहनचालकांची वाहन चालवताना त्रेधा तिरपीठ उड़ते आहे. अनेकवेळा तर अपघात देखील झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देऊन रस्ते तातडीने दुरूस्त करण्याची गरज भासत आहे.अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम करण्यात आले नाही.
तालुक्यातील विविध रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत, त्यापैकी वणी-पाटण मुख्य मार्गाला जोडलेला बोपापुर ते चीचघाट हा रस्ता अत्यंत खराब असून रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून गिट्टी रस्त्यावर विखुरलेली आहे. हा रस्ता झरी तालुक्याला जोडलेला आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या मुख्य रस्त्यावर वाहतूक चालते, शालेय विद्यार्थी, व्यावसायिक, दवाखान्यात जाणारे पेशंट या रस्त्याने जानेयेने करतात.
वाहनचालक, कामगार,शेतकरी, शालेय विध्यार्थी हे सुद्धा हैराण झाले आहेत. निवडणूक तोंडावर आली कि लोकप्रतिनिधी घरोघरी चकरा मारतात, मोठमोठे आस्वासन देऊन जातात परंतु निवडणूक झाल्यावर त्या भागातिळ समस्या पाहायला यांच्याकडे वेळ नसतो.सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींनी या रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष द्यावे अशी मागणी जनतेकडून होत आहे.
