
पावसाळा आला की अनेक आजाराची लागण होते पावसाळ्यामध्येच हे आजार वाढीस लागतात जसे की, सर्दी, ताप, हिवताप, मलेरिया, डेंगू, टायफाईड, इत्यादी आजार प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये जोर धरताना दिसतात किंवा वाढीस लागतात, त्याचप्रमाणे आजच्या परिस्थितीमध्ये राळेगाव तालुक्यामध्ये व स्थानिक गाव पातळीवर डोळ्यांचा फ्लू या आजाराची लागण झाल्याचे फार मोठ्या प्रमाणात लक्षणे दिसत आहेत. नागरिकांनी मुळीच घावरून जाऊ नये, घरातील ज्या व्यक्तींना, डोळ्याची लागण झाली आहे त्या व्यक्तीने इतर व्यक्तीपासून दूर राहावे, त्या व्यक्तीने डोळ्याला काळा चष्मा लावावा, डोळ्याला हात लावू नये, किंवा चोळू नये, डोळ्याची लागण झालेल्या व्यक्ती वापरत असलेले रुमाल, टावेल, बेडशीट, साबण इतरांनी ते वापरू नये त्यापासून संसर्ग होण्याची जास्त शक्यता आहे.
यवतमाळ जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन राळेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना डोळ्याच्या ड्रॉपवर लक्ष द्यावे अशी रुग्णांमध्ये बोलल्या जात आहे.
