
वेळेचे राहिले नाही बंधन ; मुख्यालयी न राहता घरभाडे इतर भत्त्यांचाही घेतात लाभ..?
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी
एकही विद्यार्थी ज्ञानापासून दूर जाऊ नये या शैक्षणिक कार्यक्रमासाठी अस्तित्वात असलेले प्रत्येक सरकार सर्व शिक्षा अभियानांतर्गत अनेक उपाययोजना अवलंबून विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या वाहिनीमध्ये समाविष्ट करण्यासाठी काटेकोर कार्यपालन करताना बघितले आहे.
आत्ताच्या प्राथमिक शैक्षणिक प्रणाली मध्ये विद्यार्थ्यांवर अनेक पुस्तकाचे मोठे ओझे आहे. ठरलेल्या क्षणी पूर्ण परिपाठाचा शेवट करायचा असतो हे विद्यार्थ्यांची खूप मोठी परीक्षा व एक कठीण प्रसंगच असते. पण असे असताना ज्ञान देणारे गुरुजी मात्र शाळेत उशिरा येऊन ही घरी तत्काळ परतण्याची सवय त्यांना स्वस्त बसू देत नाही.
बंदी भागातील शिक्षकांना प्रोत्साहन भत्ता, घरभाडे वसूल करूनही अनेक शिक्षक आपल्या ठरलेल्या वेळेच्या आधी घराकडे गेलेले असू शकतात “एकमेका सहाय्य” करू ही योजना राबवली जाते?? शाळेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज बघितल्यास हे लक्षात येईल व पितळ उघडे पडू शकते?? पण शिक्षण विभाग व यावर अंकुश ठेवणारे लोकप्रतिनिधी निष्प्रभ निकामी ठरले परिणामी गुरुजी शाळा सुटण्याआधी जाण्याच्या छंदाला आळा घालण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. हजारो रुपये पगार वसूल करून केवळ स्वहितासाठी चळवळ करणाऱ्या गुरुजींना शाळेत वेळ चुकवून येण्याचा व घरी तत्काळ वापस फिरण्याचे ग्रहण लागल्याचे दिसून येते. याचे नको ते परिणाम प्रकर्षाने पुढे येतात.
खेडेगावातील व बंदी भागातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या प्रगतीवर परिणाम पडतो आहे. विचार करण्यासारखी बाब म्हणावी लागेल जिल्हा परिषद शाळा, विद्यालयाच्या दर्जा खासगी शाळा पेक्षा वाढवा या साठी केंद्र व राज्य शासनातर्फे सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रकार करताना बघितले पण यामध्ये विविध असलेल्या करामती दप्तराच्या बाहेर निघत नसल्याने त्याचा फायदा बंदी व खेडेगावातील परिसरातील विद्यार्थ्यांना मिळत नाही. त्याचा फायदा फक्त संस्थाचालक घेत असतात यावर नजर ठेवणारे केंद्रप्रमुख व विस्तार विद्यार्थ्यांच्या कडे कानाडोळा करत आहे.
शिक्षक कार्यरत असलेल्या ठिकाणी उपस्थित असल्याचा तथ्यहीन अहवाल गट शिक्षणाधिकारी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना पाठवतात?? वर्तमान परिस्थितीत विद्यार्थ्याचे जगणे म्हणजे अनंत अडचणीची खैरात असताना पण गुरुजी व त्याला अनुसरून प्रशासन हाकणाऱ्या करू, पाहू, होईल, या वागणुकीमुळे आजपावेतो शासनामार्फत काम करत असलेल्या जिल्हा परिषद व विद्यालयातील शैक्षणिक दर्जा खूप विदारत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुलांच्या आई-वडिलांनी मराठी शाळेकडे दुर्लक्ष केल्याचे आढळून येत आहे.
