
सहसंपादक : रामभाऊ भोयर
कर्जमाफीला पात्र असतांनाही कर्ज माफ न झाल्याने उच्च न्यायालयात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दाद मागितली. न्यायालयाने तीन महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश दिले मात्र अवधी पूर्ण होऊनही शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आली नाही, आता हे शेतकरी अवमान याचीका दाखल करणार आहे. मात्र शासनाचा निगरगट्टपणा या निमित्ताने समोर आला आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने शेतकरी अवमान याचिका दाखल करणार आहेत. तशा आशयाच्या नोटीस शेतकऱ्यांच्यावतीने वकिलांनी संबंधित अधिकाऱ्यांना पाठविल्या आहेत.
यवतमाळ जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेपासून जिल्हा व राष्ट्रीयकृत बँकेचे मिळून ७० हजारांवर शेतकरी वंचित आहेत. या कर्जमाफीसाठी सरकारला सातशे कोटींहून अधिकची तरतूद करावी लागणार आहे. पात्र असूनही तांत्रिक अडचणीमुळे कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने हे शेतकरी बँकेच्या दृष्टीने थकबाकीदार आहेत. त्यामुळे बँकांनी त्यांना कर्ज देणे थांबविले आहे. सरकार कर्जमाफी करीत नाही हे लक्षात आल्यावर यवतमाळ, कळंब, राळेगाव, आर्णी तालुक्यातील चारशेवर शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी मुंबई उच्च न्यायलय खंडपीठ नागपूर येथे याचिका दाखल केली होती. तीन महिन्यात कर्जमाफी चा लाभ देण्याचे आदेश न्यायालयाने दिले हा कालावधी उलटून गेला मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली नाही.
अवमान याचिका दाखल करणार
न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. त्यावर उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर सहा आठवड्यांत निर्णय घेण्याचे आदेश २ मे २०२४ रोजी दिले. जिल्ह्याधिकारी यांनी ३ मे रोजी तातडीने बैठक घेऊन पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे निर्देश बँकांना दिले. पण वर्ष उलटूनही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याने आता शेतकरी न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार असल्याची माहिती कळंब तालुक्यातील पिंपरी दरने येथील शेतकरी बाबासाहेब दरणे यांनी दिली आहे.
यवतमाळ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. सततच्या नापिकीने इथला शेतकरी गँभीर परिस्थितीतुन जात असतांना कर्जमाफी करीता तो पात्र असतांना त्याला डावलण्यात आले. आम्ही अनेकदा शासन- प्रशासनाकडे दाद मागितली पन काहीच झाले नाही त्यानंतर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागला पन सरकार ने अजूनही कर्जमाफी दिली नाही. सरकार चा हा नाकर्तेपणा चिढ आणणारा आहे.
– बाबासाहेब दरणे
हिवरा द.
