
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
श्री गुरुदेव आत्मानुसंधान भु-वैकुंठ अड्याळ टेकडीच्या पंचमोत्सवा पैकी मोठा महोत्सव म्हणजेच गुढीपाढवा – पुज्य तुकारामदादा गीताचार्य यांच्या पावन तपोभूमीत दि. १९ मार्च २०२६ ला संपन्न झाला. त्यात प्रमुख्य मार्गदर्शक श्री. सुबोध दादा, मार्गदर्शक व संचालक भु-वैकुंठ अड्याळ टेकडी, प्रमुख उपस्थितीत डॉ. नवलाजी मुळे अध्यक्ष अड्याळ टेकडी, सुश्री रेखाताई, श्री. किशोरजी तिडके पोलीस पाटील, श्री. दिलीपजी भोयर गडचिरोली, लालचंदजी नखाते मोखारा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सर्व प्रथम सत्संग भवनातून प्रदक्षिणा काढून गुरुपद गुंफा येथे पूजन व आरती करून महासमाधी येथे सर्व उपस्थित कार्यकर्त्यांची रामधून काढली. महासमाधीवर मार्गदर्शन करीत रामधुनचा समारोप झाला.
प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. नवलाजी मुळे यांनी प्रास्ताविक मध्ये गुढीपाडव्याचे महत्व विशद केले. सुत्री रेखाताई (महिला प्रमुख) यांनी अड्याळ टेकडीची चालू घडामोडी यावर मार्गदर्शन केले, श्री. सुबोधदादा यांनी त्यांच्या मार्गदर्शन मध्ये गुढीपाडवा चे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व, अड्याळ टेकडी निर्मिती चे तत्त्वज्ञान आणि कार्यक्रमापेक्षा कार्य हिच खरी पूजा या पू तुकाराम दादा गीताचार्य यांच्या मूलमंत्राप्रमाणे पुढील ग्रामजयंती चा कार्यक्रम कमीत कमी खर्चात आणि जास्तीत जास्त सक्रियपणे कसा साजरा करायचा यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर ग्रामजयंती निमित्त विविध भागात गुरुदेव सेवा मंडळ कार्यकर्ता मेळावा घेण्याचे नियोजन करण्यात आले. ग्रामगीता लवकरच तेलगू भाषेत छपाई करण्याचे घोषित केले, तेव्हा गुरुदेव भक्तांनी या कार्यासाठी आणि प्रकाशन मंडळ साठी आर्थिक सहकार्य जाहीर केले.
येथे संकल्प घेणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी आपले संकल्प पूर्ण केले. मांदेड येथील श्रमदानी मंडळीचे भोजन बनविण्याची सेव दिल्याबदद्दल स्वागत श्री सुबोधदादांचे हस्ते करण्यात आले. सुश्री. गंगाताई कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
शेवटी शांतीपाठ व जयघोष घेवूनसर्वांना भोजनगृहात
महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आव्हाहन करण्यात आले.
