
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
सध्या सर्वत्र महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला असून शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त आहेत त्याचबरोबर अवघ्या तीन-चार दिवसांवर रोहिणी नक्षत्राला सुरुवात होणार असून शेतकरी आता बियाणे खरेदी करणार असल्याने संधीचा फायदा घेत तेलंगणातून येणाऱ्या चोर बीटी बियाणे विक्रीचा शिरकाव सुरू आहे.
तालुक्यात सध्या चोर बीटी बियाण्याचे विक्रीकरिता दलाल सक्रिय झाले असून शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना या चोर बी टी बियाण्याची चुकीची माहिती देत खरेदी करण्यास प्रवृत्त करत आहे. परंतु शेतकऱ्यांनी या आमिषाला बळी न पडता फाईव्ह जी या चोर बीटी बियाण्यामुळे दुष्परिणाम होत असून शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी , या फाईव जी चोर बीटी बियाण्यामुळे पर्यावरण व आरोग्यास घातक असते या बियाण्याची विक्री करण्यास शासनाची परवानगी नाही त्या बियाण्याच्या पाकीटवर कोणतेही प्रकारचे वाण तंत्रज्ञान शिफारस लिहिलेले नसते त्यावर त्यांना नाशकाची फवारणी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे विविध आजार होतात पर्यायाने शेताचे पर्यावरणाचे नुकसान होते या सोबतच मानवी आरोग्यासही हानी पोहोचते तसेच अनधिकृत बोगस बियाण्यामुळे फसवणूक झाल्यास पक्के बिल नसल्यामुळे कोणतीही नुकसान भरपाई मिळत नाही त्यामुळे खरिपाची तयारी करतेवेळी शेतकऱ्यांनी नामवंत कंपनीचे चांगले गुणवंत चे बियाणे खरेदी करावे व खोट्या आमिषाला बळी पडू नये.
कोणी कमी पैशात बोगस बियाणे व चोर बिटी बियाणे विक्री करत असेल तर शेतकऱ्यांनी कोणत्याही खाजगी व्यक्तीकडून बियाणे खाते कीटकनाशके खरेदी करू नयेत सील अथवा मोरबंद पाकिटे पिशव्या बाटल्या असल्याची खात्री करावी उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरील अंतिम मुदत पहावी बियाणे खरेदी करतेवेळी कोणतीही शंका आली की लगेच तक्रार असल्यास पंचायत समितीच्या तक्रार निवारण कक्षाकडे नोंदवावी पंचायत समिती कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा तसेच नागरिकांना माहिती असल्यास तालुका कृषी कार्यालयाला गोपनीय माहिती द्यावी.
मनीषा पाटील कृषी अधिकारी राळेगाव
