
प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर
गेल्या 9 दिवसा पासून सुरु असलेल्या बंडू भाऊ धोतरे यांचे अन्नत्याग सत्याग्रह सुरु आहे , या सत्याग्रह मागील गाम्भीर्य जाणून घेण्या करिता आम आदमी पार्टी ने मंड़पाला भेट देली.
चंद्रपुर हे एक ऐतिहासिक शहर असून या मधील अनेक तलावाचे सवंर्धन करण्यात आले नाही म्हणून त्यात अतिक्रमण करून वस्ति निर्माण झाली फक्त एकमात्र रामाळा तलाव उरलें असताना त्याचे सुधा वास्तव्य कालबाह्य होताना दिसत आहे. रामाळा तलावाचे सवंर्धन करण्या करिता अनेक मागणी करण्यात येत आहे तरी विविध स्तरावर बैठका घेऊन सुद्धा खोलिकरण करण्यात आले नाही ही मोठी शोकांतिका आहे . रामाळा तलावातील मासे मृत्युमुखी पड़त आहे, परिसरात दुर्गंधि पसरत आहे त्यामुळे मत्स्यव्यवसाय व जवळील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे .
आम आदमी पार्टी ने रामाळा तलावाला वेढा घातला व रामाळा तलावाला वाचवा आणि सहकार्य करा हा नारा देण्यात आले .आम आदमी पार्टी ने रामाळा तलावाला वेढा घातला व रामाळा तलावाला वाचवा आणि सहकार्य करा हा नारा देण्यात आले .
मा. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकाराने रामाळा तलावाचे सौन्दर्यीकरण करण्यात आले परन्तु नुसत्या देखाव्या व सौन्दर्यकरनाने तलावाचे संवर्धन करता येत नाही तर खोलिकरन करने, सांडपाणी थांबवने, अतिक्रमण थांबवने, माल धकयाचे यूरिया तलावा मध्ये मिसळू न देने इत्यादि उपाय योजना करण्यात याव्या या करिता इको प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे हे अन्नत्याग सत्याग्रहास बसले आहे व त्यास आम आदमी पार्टी तर्फे जाहिर पाठींबा देण्यात येत आहे या पुढील आंदोलनात आम आदमी पार्टी सक्रीयपणे सहभाग घेईल .मा.माजी मंञी सुधिर मुनगंटीवार यांनी ईरई नदीच्या सोंदर्यीकरणात करोडो रूपये खर्च केले त्याचा काहीच फायदा झाला नाही .त्यामुळे तात्काळ बंडू धोञे यांच्या मागण्या गांभीर्याने घ्याव्या अशी मागणी सुनिल मुसळे यानी केली. शिष्टमंडळामध्ये चंद्रपुर जिल्हाध्यक्ष सुनील मूसळे, जिल्हा सचिव सन्तोष दोरखंडे, जिल्हा कोशाध्यक्ष भिवराज सोनी, जिल्हा सोशल मीडिया हेड राजेश चेडगुलवार, महानगर उपाध्यक्ष योगेश आपटे, कोषाध्यक्ष अशोक आनंदे, ऑटो संघटन चे अध्यक्ष शंकर धुमाले , मयूर राईकवार, एडॉ. राजेश वीरानी, बबन कृष्णपल्लीवार, प्रदीप बोबडे, साखरकर जी, प्रतीक वीरानी, धकाते जी , सौ वंदना गवली , आणि असंख्य कार्यकर्ता उपस्थिती होते….
