
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील बोरी संगम येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार,युगपुरुष महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. या जयंतीच्या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात बोलताना डॉ ओम प्रकाश फुलमाळी यांनी आजची सशक्त स्त्री ही बाबासाहेबांची देणं असून एसी एसटी ओबीसी चे जनकही बाबासाहेबच आहेत
“शूद्र ढोर और नारी सब तांडन के अधिकारी स्त्रियांना गुराढोराप्रमाणे वागणूक देणाऱ्या मनुवादी व्यवस्थेतून बाहेर काढून त्यांना पुरुषांच्या बरोबरीनेच नव्हे तर त्यांच्या पेक्षा जास्त अधिकार बाबासाहेबांनी त्यांना मिळवून दिले त्यामुळेच आज स्त्रिया डॉक्टर, इंजिनियर,वकील, कलेक्टर, ते राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचू शकल्या त्यामुळे मी भारतातील संपूर्ण स्त्रियांना एक संदेश देतो की तुम्ही तुमचे आर्थिक कार्य जरूर करा कारण तो अधिकार आपल्याला संविधानाने दिलेलाच आहे पण तुम्ही जर नोकरी वरती कर्तव्यावर जात असताना शाळा कॉलेजमध्ये जात असाल आणि रस्त्यात जर बाबासाहेबांचा पुतळा दिसला तर एकदा बाबासाहेबांना अभिवादन करून समोरचा जा कारण ते सगळं तुम्हाला बाबासाहेबच्या संविधानानेच मिळवून दिलेले आहे, तसेच फोडा आणि राज्य करा या मनुवादी नीतीचा वापर करून पाच हजाराहून अधिक जातीत विभागला गेलेला बहुजन समाज हा बाबासाहेबांनी राज्य कर्ता व्हावा म्हणून एक सूत्रात म्हणजे एससी एसटी आणि ओबीसी या वर्गीकरणात आणला त्यामुळे ओबीसीचे जनक बाबासाहेबच आहे असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
विशेष म्हणजे ज्या गावात बौद्धांची घरे नसताना किंवा समाजबांधव नसताना संगम या गावातील विकास इंगोले तथा त्यांच्या गावकऱ्यांनी मागील चार ते पाच वर्षापासून मोठ्या थाटामाटात बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहे त्यामुळे बाबासाहेबांची ओबीसी बांधवाकडून जयंती साजरी करणे ही तालुक्यातच नाही तर जिल्ह्यातही एक कौतुकास बाब ठरली असून या प्रमाणे प्रत्येक गावातही ओबीसी बांधवांनी बाबासाहेबांची जयंती साजरी करायला हवी असेही मत यावेळी व्यक्त केले.
यावेळी उपस्थित कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माझी प्राध्यापक सारंग गावंडे सर,तर प्रमुख अतिथी म्हणून मेघराज निमसरकर,रमेश भोयर, संतोष वाघमारे (पोलिस पाटील), बोरकर, थूटूरकर अमोल थूल,आनंद पन्नासे, सुरेंद्र मेंढे,आदी पोलिस पाटील होते तर कार्यक्रमाला प्रमुख वक्ते प्रमोद कांबळे,सौ.समीक्षा गायकवाड, साहिल सोनारखन, अमर सोनारखन, मनस्वी सोनारखन, संबोधी सोनारखन, राणी इंगोले, उपस्थित होते.
कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून थूल सर (आर्णी) हे लाभले होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू उमरे यांनी केले तर कार्यक्रमाला उपस्थित संजय इंगोले, प्रवीण काकडे, मुन्नाभाई गायकवाड, अनिल ताकसांडे, प्रीतम फुलमाळी, सुरेंद्र येसनकर, नागसेन वाघमारे ,भीमराव गांजरे, प्रकाश आंबटकर,चरणदास गायकवाड, तुकाराम थूल, विजय थूल,बाबाराव गायकवाड ,प्रकाश वागदे,हिरानंद नाखले ,नंदाबाई गायकवाड रजनीताई शंभरकर बेबीताई वाघमारे आदी समाज बांधव यावेळी उपस्थित होते
