
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे
मंगलाताई ठक. सामाजिक कार्यकर्ता, यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पाठवले निवेदन. देशभरात कोरोणा नी हाहाकार घातला आहे. व बरेच निराधार गरजू लोकांपर्यंत शासन व प्रशासन पोहचू शकत नाही अशा निराधार , अपंग, परित्क्त्यातील महीला व म्हाताऱ्या लोकान पर्यंत आमची संघटना जावून शोधून काढते आहे व त्यांना योजनांची माहिती व योजना त्यांच्या पर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहे . गेल्या 2012 पासून आमच्या ज्येष्ठ नागरिक निराधार संघटनेनं या कामासाठी स्वतःला झोकून दिलं आहे . निराधारांची सेवा हीच ईश्वर सेवा समजून निराधारांना न्याय देण्याचा काम आम्ही गेल्या कित्तेक वर्षांपासून करीत आहोत ..
हे करत असताना असे निदर्शनास आले की निराधरांची उत्पन्न मर्यादा गेल्या कित्तेक वर्षापासून शासनाने 21000 रू निर्धारित केली आहे . परंतु 21000 जर निरधारांची उत्पन्न मर्यादा शासन ठरवतो तर 29 , 29 रुपयात दोन वेळचे जेवण या महागाईच्या काळात निराधार बांधव कसे करतील आणि दवाखाना , खानपान , औषधी या सगळ्या गोष्टी कशा करतील म्हणून मी शासनाला वारंवार पत्र लिहून लक्षात आणून दिले परंतु शासनाने ज्येष्ठ नागरिक व निराधारांच्या उत्पन्न मर्यादा अद्याप वाढवून दिली नाही
एकीकडे शासन 21000 रुपयाचा निराधारांना दाखला मागतो तर दुसरीकडे 21000 दाखला देण्यास नकार देतो असे किती दिवस चालणार म्हणून शासनाने निराधारांना उत्पन्न मर्यादा 21000 वरून वाढून किमान 50000रू करून देण्यात यावी. महागाईचा काळ बघता तेवढीच मी सरकारला विनंती करतो . महाराष्ट्रात आपलीच सरकार आहे . निराधार संघटने सोबतच मी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे कार्यभार सांभाळते म्हणून मी आपल्याच सरकारला अतिशय नम्रपणे असी मागणी करते. असे निवेदन मंगलाताई ठक सामाजिक कार्यकर्त्या यांनी दिले.
