गणेशपूर येथील जनतेला मिळणार आता शुद्ध पाणी

ग्रामपंचायत खडकी गणेशपुर येथे गेल्या अनेक वर्षा पासून दूषित पाणी मिळत होते त्यामुळे अनेक आजाराचा सामना करावा लागत होता ही बाब ग्रामपंचायत चे सरपंच व उपसरपंच सदस्य यांनी लक्षात घेत जल शुध्दी करण यंत्रा ची मागणी पंचायत समिती मार्फत जिल्हा परिषद यवतमाळ येथे केली. जिल्हा परिषद व ग्रामपंचायत च्या सहकार्यातून आज आर ओ फिल्टर चे उद्घाटन सरपंच शुभांगी राजू लोडे व उप सरपंच व सदस्य यांनी केले. त्या वेळी गावातील नागरिक उपस्थित होते. गणेशपूर येथील जनते कडून सरपंच व उपसरपंच सदस्य यांचे कवतुक होत होते