
मुठारा येथील समता महोत्सवात गर्जली श्रीगुरुदेव सेनेची तोफ
वणी:- थोर संत महापुऋष्यांच्या विचारातील भारत घडवायचा असेल तर त्यांनी सांगितलेल्या उपदेशातील कृतीतुन जीवन जगायची सुरवात करु तरच त्यांच्या विचारातील आणि स्वप्नातील भारत आपण घडू शकतो असे मत मौजे मूठरा तालुका राजुरा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य काल ता. 14 एप्रिल रोजी दुपारी 4 वा. आयोजित समता महोत्सवतील व्याख्यान मालेच्या सत्रातील अध्यक्षीय भाषतून श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भोयर यांनी व्यक्त केले. ते बहुजन महापुरुष्यांच्या संकल्पनेतील भारत व सध्यास्थिती या विषयावर बोलत होते.
चंद्रपूर जिल्यातील राजुरा तालुक्यात असलेल्या मुठारा येथे भीम जयंती बोद्ध विहाराच्या प्रगनात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी समता महोत्सवाच्या नावाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यातील दुपारच्या वेळी विविध विषयावर व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यान मालेले अध्यक्ष म्हणून वणी येथील श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून वरोरा येथील निखिल ठमके, तर गोंडवाना राष्ट्रीय जंगम दलाच्या महिला अध्यक्षा सुवर्णा वरखडे, पांढरकवडा तर राजुरा येथील सामाजिक कार्यकर्ते गौतम सर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना दिलीप भोयर म्हणले की, बहुजन महापुरुष्यांनी या देशातील तमाम शोषित पीडित समजाच्या मानसिक, आर्थिक, बौद्धिक, शारीरिक शोषन विरुद्धचा लढा समाजात समता निर्माण लढा लढला आहे. ब्राम्हणी मनुवादी व्यवस्थेने बहुजन समाजाची वैचारिक पातळी ही षंड करून सोडली आहे. त्यामुळे आजच्या स्थितीतील गुलामीच्या विकृतीला आम्ही संस्कृती समजत बसलो आहे. बहुजन समाजातील महापुरुष्यांच्या संकल्पेनेतील भारत घडविण्यासाठी महापुरूष्यांचा संघर्ष समजून घेतण्याची गरज आहे. बहुजन महापुरुष्यांनी देशातीलच शोषित व्यवस्था निर्माण करणाऱ्या ब्राम्हणी मनुवादी व्यवस्थिशी संघर्ष केला आहे. देशाला वर्णवादी व्यवस्थेने बर्बाद केले आहे. अश्या अनेक विषयावर आपल्या मनोगतातून प्रकाश टाकून उपस्थितांना संबोधिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुबे मॅडम यांनी केले.
मी रमई बोलते या एकपात्री नाटकेंने लक्ष वेधले
पुणवट ता. वणी येथील कु.आयुषी अशोक राखुंडे हिने मी रामाई बोलते या एकपात्री नाटकेंतून आई रमाईच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकल्याने उपस्थितांचे या एकपात्री नाटकेंवर चांगलेच लक्ष वेधले होते.
