वीज वितरण कंपनी राळेगावचा भोंगळ कारभार,शेतात लोंबलेले तार धोकादायक

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आता जवळपास सात दिवसावर माँन्सून येऊन ठेपलेला आहे,परंतु विद्युत महामंडळ राळेगाव यांना विविध कास्तकार बंधूंनी वारंवार लेखी तक्रार देऊन सुद्धा त्यांचा विद्युत पुरवठा कोणत्याही प्रकारे व्यवस्थित करावा जेणे करून समोर पावसाळा असल्याने शेतकऱ्यांना व विद्युत महामंडळाला कोणताही त्रास होणार नाही परंतु आजता गायत कोणतेही कारवाही केला नाही तसेच शेतात असलेले अवास्तव पोल त्यातील खाली लोंबलेले तार त्यामुळे शेतकऱ्याना जमिनीची मशागत करीत असताना होत असलेला नाहक त्रास याची कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी राळेगाव कोणतीही जबाबदारी स्वीकारत नसून उलट सुलट शेतकऱ्याना उत्तर देऊन आपली बाजू सावरतात परंतु मौजा श्रीरामपूर तसेच विविध ठिकाणी मौजा श्रीरामपूर गट क्रमांक 32/ 4 /अ शेतामधील आपल्या वीज वितरण कंपनीचे विद्युत खांब अतिशय धोकादायक परस्थितीमध्ये आहे यांची वारंवार सूचना लेखी स्वरूपात देऊन सुद्धा यांच्याकडे जाणीवपूर्वक वीज वितरण कंपनीचे अभियंता साहेब दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे, त्यांचे वीज ग्राहकांचे वीज बिल क्रमांक 374220056609 हा असून संपूर्ण बिल आज रोजी भरलेले आहे, तरी याकडे कोणत्याही प्रकारचे प्रत्यक्ष पाहणी सुद्धा करण्यात तयार नाहीत त्यामुळे यावर्षी त्यांच्या शेतातील मशागत होईल का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे, अशा तक्रारी लेखी स्वरूपात देऊन सुद्धा यांच्याकडे दुर्लक्ष केल्या जाते याची जबाबदारी विद्युत वीज वितरण कंपनी राळेगाव घेतील का ? आणि शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवेल का ? असा प्रश्न जनसामान्यात होत आहे खरे पाहता जगाचा पोशिंदा शेतकरी परंतु नेहमी त्यांनाच नाहक त्रास सहन करावा लागतो करिता सर्व स्तरावरून एकच अपेक्षा ठेवण्यात येत आहे शेतामध्ये विद्युत खांब वाकून असून तार जमिनीशी लोंबत आहे तरी ते सदर दुरुस्ती करण्यात यावी असे लेखी स्वरूपात 11:05 2022 रोजी लेखी तक्रार दिली तसेच विद्युत रोहित्र सहा महिन्यापासून बंद आहे, दुसरीकडून लाईन दुसऱ्या विद्युत रोहित्र वरून जोडण्यात आली तरी त्यांचे बिल भरून असून त्यांना स्वतंत्र विद्युत रोहित्र यंत्र चालू करून देण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे जर अनपेक्षित काही घडले तर यास वीज वितरण कंपनी राळेगाव जबदार राहील का? असा सुर शेतकरी बांधव कडून येत आहे.