नुकसान भरपाईची रक्कम त्वरित द्यावी:माजी सभापती 0प्रशांत तायडे यांची मागणी

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात सर्वात जास्त अतिवृष्टीमुळे व ढगफूटी सारखा धो धो पाऊस राळेगांव तालुक्यात जुलै, ऑगस्ट महिन्यात पडल्याने शेतशिवारातील पीक उध्वस्त झाले. अख्खे शेत शिवारात तलावसदृष्य परीस्थिती निर्माण होऊन संपूर्ण पीके पाण्याखाली राहील्याने सड मोठ्या प्रमाणावर होऊन, दुबार, तिबार पेरणी चा नाहक भुर्दड शेतकऱ्यांना बसला आहे. या शिवाय रस्ते उखडले, घरांची व जनावरांचे गोठ्यांची पडझड झाली आहे, याची नुकसान भरपाई देणार म्हणून शासन वारंवार सांगत आहे. मंत्री महोदय आणि विरोधी पक्ष नेते सह सर्व मंडळी नी नुकसान ग्रस्त भागांचा पाहणी दौरा केला, आज दोन महिने झाले तरी सुध्दा नुकसान भरपाई मिळालीच नाही ही त्वरित द्यावी अशी मागणी पंचायत समिती राळेगांव चे माजी सभापती प्रशांत तायडे यांनी प्रशासना कडे केली आहे. आधीच आर्थिक नुकसान झाले असून, वरुन निसर्गाच्या भारी प्रकोपामुळे राळेगांव तालुक्यातील शेतकरी बांधव चिंताग्रस्त व हवालदिल झाले आहेत. याच काळात नऊ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याने नुकसान भरपाई त्वरित द्यावी अशी मागणी पंचायत समिती राळेगांव चे माजी सभापती प्रशांत तायडे यांनी केली आहे.

बॉक्स==
राळेगाव पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत भाऊ तायडे यांची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्यात यावी स्वतः सत्तेत असून आपली शेतकऱ्यां प्रती असलेली संवेदना मांडताना दिसून येत आहेत,परंतु तालुक्यातील सत्ताधारी व विरोधी नेते झोपीचे साँग घेतल्याचे दिसून येते आहे ,या मागणीकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्यात यावे अशी चर्चा तालुक्यातून होताना दिसत आहे.