शाॅट सर्किट ने आग लागून तुर, कापुस जळून खाक हजारों रुपयांचे नुकसान

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील चहांद येथे शॉट सर्किट होऊन लागलेल्या आगीत कापूस व दोन पोते तुरी जळून खाक झाली असून या आगीमध्ये शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असल्याची घटना घडली आहे.
सविस्तर असे की दिं २४ फेब्रुवारी रोजी चहांद येथील शेतकरी रमेशराव जवादे यांच्या घरी पन्नास क्किंटल कापसाची गंजी लावलेली होती व दहा पोते तुरी होत्या अचानक शॉट सर्किट झाल्याने दहा क्किंटल कापूस व दोन पोते तुरी जळून खाक झाला असल्याची घटना घडली असून या
घटनेची माहिती गावकऱ्यांना होताच घटना स्थळाकडे धाव घेत गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले असून कापूस व तूर जळल्याने मात्र शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तरी झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून योग्य ती मदत देण्यात यावी अशी मागणी जवादे यांनी केली आहे.