
शैक्षणिक,आरोग्य सुविधा व इतर विकासाच्या बाबतीत हिंगणघाट तालुका माघारलेला.
हिंगणघाट:-१० एप्रिल २०२३
हिंगणघाट जिल्हा घोषित करण्याबाबत माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
वर्धा जिल्ह्याचा परिसर हा आर्वी- आष्टी- कारंजा ते हिंगणघाट-समुद्रपूर तालुक्यातील गिरडच्या टोकापर्यंत
असून लोकसंख्या वाढली आहे. हिंगणघाट परिसराला नागपूर,चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्याच्या सिमा लागल्या असून हायवेचे रोड जोडल्या गेले आहे.
यवतमाळ जिल्ह्याचा परिसर वणी तालुका, केळापुर तालुका (पांढरकवडा) ते आणि तालुक्यातील तेलंगणा व आंध्रप्रदेशच्या सिमेपर्यंत असून खुप मोठ्या प्रमाणात व्यापला असून जिल्ह्याची कामे करतांना नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचा वरोरा, चिमुर तालुका हिंगणघाट परिसराला १५ ते २० किलो मिटर अंतरावर लागून आहे.नागपूर जिल्ह्याचा उमरेड तालुक्याचा परिसर ३० कि.मी. अंतरावर जोडला गेला आहे.
हिंगणघाट परिसराला यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर (पांढरकवडा) तालुका, वणी तालुका राळेगाव तालुका लागून आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, चिमुर तालुके जवळ आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्याचा परिसर सभोवताल आहे.
नागपूर ते कन्याकुमारी नॅशनल हायवे नं. ७ हा हिंगणघाट तालुक्याच्या परिसरातून गेलेला असून मोठ्या प्रमाणात दळण-वळणाची साधने उपलब्ध आहे. नागपूर ते मद्रास रेल्वे-लाईन हिंगणघाट परिसरातून गेली आहे. नागपूर ते चंद्रपूर नॅशनल हायवे आंध्रप्रदेशच्या परिसराला जोडला गेला आहे.
हिंगणघाट परिसराला नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्याचा परिसर जोडून हिंगणघाट जिल्हा निर्माण होऊ शकतो. लोकसंख्या आणि परिसिमा यांचा भौगोलिक विचार लक्षात घेता हिंगणघाट जिल्हा घोषित करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
