शासकीय यंत्रणेमार्फत कंत्राटी पदभर्तीचा निर्णय रद्द करा : लढा संघटनेची मागणी

प्रतिनीधी वणी नितेश ताजणे

शासकीय कार्यालयामध्ये खाजगी यंत्रनेमार्फत अधिकारी व कर्मचारी यांच्या कंत्राटी भरती बाबतचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी सोमवारी दिनांक १८ सप्टेंबर ला ढला या संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी वणी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी शेकडो विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयासमोर धडक दिली होती.

शासन निर्णय क्र.संकिण २०१०/ प्र.क्र.१३ / कामगार, दि. ६ सप्टेंबर २०२३ संदर्भीय शासन निर्णय प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवून विकास कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने बाह्य यंत्रणेद्वारे शासकीय कामे करुन घेण्याचे जे धोरण आखलेले आहे ते अत्यंत चुकीचे असून महाराष्ट्रातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांच्या हिताचे नाही.
महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वर्षापासुन शासकीय नौकरभरती घेण्यात आलेली नाही. या नौकरभरतीची बरेच सुशिक्षीत विद्यार्थी- विद्यार्थीनी चातक पक्ष्याप्रमाणे वाट पाहत होते. बऱ्याच दिवसांपासून या विद्यार्थी- विद्यार्थीनी स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करीत आहे. हा शासन निर्णय त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवणारा आहे. त्यामुळे महाराष्ट्रामधील संपूर्ण तरुणांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे. या शासन निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांचे जीवन अंधकारमय होईल व त्यांना बड्या कंपन्याची गुलामगिरी करावी लागेल. संबंधीत शासन निर्णयामुळे आरक्षणाची मागणी सुद्धा धोक्यात आलेली आहे. कंत्राटी पद्धतीने काम करत असल्यमुळे भविष्यात त्यांची नोकरी कायम राहील किंवा नाही ही भिती सुद्धा तरुणांच्या मनामध्ये सतत राहील. त्यामुळे दिनांक ६ सप्टेंबर २०२३ चा शासन निर्णय रद्द करून महाराष्ट्रातील तरुणांचे जीवन उज्वल करून महाराष्ट्राचा विकास करावे अन्यथा येत्या ७ दिवसात सदर शासन निर्णय रद्द झाला नाही तर महाराष्ट्रातील तरुणाई रस्त्यावर उतरेल व आपला संविधानीक हक्क मिळविण्याकरिता लढा देण्यात येणार याची प्रशासनाने दखल घ्यावी अशा आशयाचे निवेदन येथिल उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले आहे.

निवेदन देतेवेळी लढा संघटनेचे प्रवीण खानझोडे , ऍड, रुपेश ठाकरे, विकेश पानघाटे , वैभव ठाकरे, ललित लांजेवार, राहुल झट्टे , महादेव तूरणकर , सुभाष लसंते , अजय कवरसे , सिमा कुमरे, पायल टिपले, सुरभी महाकुलकार, विलासनी काशीकर, तानिया पठान, प्रियंका गेडाम, श्रद्धा राजुरकर, अश्विनी वाघमारे, पायल टेंभुरकर, वैष्णवी चेंदे , करिश्मा आडे, स्वरा उईके , निलिमा मोन, प्रिया राजुरकर,प्रतिक्षा पांगुल , नेहा ठाकरे, काजल बोबडे, निकिता बावने ,पलाश मोतेकर , ज्ञानेश्वर कोरडे, महादेव तेजे, अक्षय नालमवार , गणेश किनाके, मयूर बेलेकर, प्रफुल मोहितकर, वैभव चिंचोलकर, आकाश हिवरे, हेमंत क्षीरसागर यांच्या सह विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.