मालाचे भाव पडे, अन शेतकरी रडे तरीही म्हणतात “अच्छे दिन,खते औषधाचे दर वाढतात सोयाबीन कापसाला भाव कधी


निवडणुकीच्या काळात नुसत्याच बाता मारणारे शेतकऱ्यांविषयी गप्प का

सहसंपादक : रामभाऊ भोयर

आधीच नापिकी आणि त्यात कापूस व सोयाबीनचे दर गडगडले आहेत त्यामुळे तर शेतकरी हवालदिल झाले आहेत एकीकडे खते औषधांचे दर वाढले जात असताना शेती मालाकडे कोणीच लक्ष देत नाही असेच दिसते आहे महागाईच्या काळात शेती मालाचेही भाव वाढणे अपेक्षित असतांना भाव वाढण्याऐवजी कमी होतात मात्र निवडणुका आल्या की मोठमोठ्या नुसत्याच बाता मारणारे लोकप्रतिनिधी या शेतकऱ्यांविषयी गप्प का असा प्रश्न सध्या शेतकरी करू लागला आहे.
तालुक्यात हमीभाव खरेदी केंद्र सुरू असावे अशी मागणी अनेक दिवसापासून होऊ लागली आहे पण हमीभाव खरेदी केंद्र अजूनही सुरू करण्यात आले नाहीत या बाबीकडे लक्ष देण्यासाठी कोणीही समोर येत नाही त्यामुळे मिळेल त्या दरात शेतीमाल शेतकऱ्यांना विकावा लागत आहे परंतु दुसरीकडे खते औषध यांचे दर रोजच भाव वाढताना दिसत आहे तर मग मालाचे भाव का वाढत नाही .शेती मालाचे भाव वाढत असताना लागवड खर्चात जास्तीचा होतो आहे त्यामुळे शेती न परवडणारी झाली आहे. तालुक्यात गतवर्षी सर्वाधिक पेरा कापसाचा झाला होता त्याबरोबर सोयाबीन चा ही पेरा जास्त झाला गतवर्षी सुरुवातीलाच जून महिन्यात पावसाने लहरीपणा सुरू केला होता तसेच जुलै ऑगस्ट या दोन महिन्यात आटोवृष्टी झाली होती त्यामुळे सोयाबीन व कापसाचे मोठे नुकसान झाले त्यातच पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव झाला त्यामुळे तर पिकाच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट झाली एकीकडे बियाणे रासायनिक खते कीटकनाशके तन नाशक आदी सह उत्पादन खर्च केली असता कितीतरी पटीने वाढ झाली असताना सोयाबीन व कापसाचे दर वाढेना झाले आहे. दोन वर्षांपूर्वीचा अपवाद वगळता शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादनातून हाती काहीच लागत नाही सध्या स्थिती बाजार समितीला सरासरी ४२०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव मिळत आहे तर कापूस ७२०० हजाराच्या पुढे सरकेना झाला आहे गतवर्षी कापूस नऊ हजार रुपयापर्यंत गेला होता त्यामानाने यावर्षी कापसाला भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी हवालदार झाला असून पीक कर्ज कसे फेडायचे चिंता शेतकरी ना लागली आहे पीक कर्जाचे पुनर्गठन करणे व त्यावरील उपाय नव्हे तर शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढविणारा आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे पण हे कोणी लक्ष द्यायला तयार नसून आलेल्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत मोठ मोठ्या गप्पा मारणारे शेतकऱ्यांविषयी गप्प का बसतात हा विषय संशोधनाचा बनला आहे.

दोन पैसे पदरात पडावे म्हणून शेतकरी रात्र दिवस शेतात मेहनत करून पिकाची जोपासना करत आहे पण शेतमालाला मनवत असा भाव मिळत नाही त्यामुळे शेती न केलेली बरी असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे

शेती करणे सध्या अवघड होऊन बसले आहे वातावरणही साथ देत नाही मजुरीही वाढली अशा वेळी मलाला भाव मिळणे आवश्यक आहे.