
उमरखेड प्रतिनिधी :- संजय जाधव
सर्वत्र बकरी ईद उत्साहात साजरी होत असताना चुरमुरा येथे अचानक आलेल्या वादळ वारा व विजेच्या कडकडाटासह पावसात झाडावर वीज कोसळून झाडाखाली असलेल्या १७ बकऱ्या व ४ बोकड मृत झाल्याची घटना तालुक्यातील चुरमुरा येथे दुपारी तीन वाजता चे दरम्यान घडली सुदैवाने यात मनुष्यहानी झाली नाही. बकरी चरणाऱ्या कळपात एकूण 80 बकरी व बोकड होते त्यातील झाडाखाली आश्रय घेणाऱ्या बकऱ्या दगावल्या व इतर 59 बकऱ्यांचे प्राण वाचले.
तालुक्यातील चुरमुरा येथे आज दुपारी अडीच ते तीन च्या दरम्यान अचानक सोसाट्याचा वादळी वारा सुरू झाला यात विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाल्याने पावसापासून बचावासाठी काही बकऱ्या मोहाच्या झाडाखाली गेल्या त्याच वेळी झाडावर वीज पडून 21 बकऱ्या मृत्युमुखी पडल्या. चुरमुरा गावातील बंजारा तांडा येथील समाधान फुलसिंग राठोड हा बकरी चारक 80 बकऱ्या घेऊन चरण्यासाठी जंगलात गेला होता. बकऱ्या चरत असताना दुपारी सदर घटना घडली यामध्ये चुरमुरा येथील दत्ता गुलाब राठोड मारुती परसराम जाधव संदीप गणेश राठोड पांडू हिरु पवार शंकर किसन पवार समाधान फुलसिंग राठोड काळूराम बन्सी राठोड निलेश बळीराम चव्हाण विनोद सुदाम राठोड अनिल तुकाराम राठोड दारासिंग शामू राठोड अनिकेत दिलीप पवार सुदाम दत्ता राठोड सुनील रोडबा चव्हाण गोपाल रोडबा चव्हाण दिनेश भारत राठोड अंकुश बाबुलाल पवार यांच्या बकऱ्या मृत झाल्या असून मोलमजुरी करून बकऱ्या घेऊन संगोपन करणाऱ्या बकरी चारकावर बकरी ईदच्या दिवशी आलेल्या संकटाने हळहळ व्यक्त केल्या जात आहे . घटनेची माहिती मिळताच उमरखेड तहसीलचे कर्तव्यदक्ष तहसीलदार राजू सुरडकर यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंभारे समवेत घटनास्थळाला भेट दिली .व तात्काळ मृत झालेल्या सर्व बकरी व बोकडचे शवविच्छेदन करण्यात आले.
