अंशकालीन स्त्री-परिचर संघटनेच्या वतीने जि.प. वर धरणे आंदोलन, (अंशकालीन स्त्री -परिचरांच्या मानधनात वाढ करा – आयटक)

हा

सहसंपादक : रामभाऊ भोयर

आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री-परिचर संघटना जिल्हा शाखा यवतमाळ च्या वतीने यवतमाळ जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन कलण्यात आले आरोग्य खात्यातील अंशकालीन स्त्री -परिचरांच्या प्रलंबित मागण्या कडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या वतीने दि.२१-०१-२०२४ रोजी जिल्हा परिषदेवर धरने आंदोलन करण्यात आले यावेळी सरकारच्या कामगार विरोधी धोरणा विरोधात जोरदार घोषणांनी करण्यात आली. अंशकालीन स्त्री -परिचराच्या मानधन वाढीचा निर्णय येणाऱ्या आर्थिक बजेट मध्ये करण्यात यावा असे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्फत मा.मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य, मंत्रालयात मुंबई, मा.अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य मुंबई मा.आरोग्यमंत्री , महाराष्ट्र राज्य मंत्रालयात मुंबई यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनाद्वारे कळविले आहे, आरोग्य विभागातील अंशकालीन स्त्री-परिचरांना अतिशय तुटपुंजे मानधन दिले जात आहे. केंद्र सरकार रू.१००/- आणि राज्य सरकार रू.२९००/- देत आहे असे एकुण तीन हजार रुपये मानधन मिळत आहे. या जिवघेण्या महागाईत दोन वेळेचे जेवण सुद्धा या माध्यमातून होत नाही तरीही राज्य कर्ते दुर्लक्षित करती आहे. उपेक्षित महीलांना न्याय देत नाही…आजवर लोकशाही मार्गाने कितीतरी आंदोलने करण्यात आली शासन गरिबांच्या कल्याणाच्या फक्त बाता करतांना दिसत दुसरीकडे अंशकालीन स्त्री -परिचरांना वेठबिगारीचे जिने जगायला लावत आहे तत्कालीन सरकारचे काळात अंशकालीन स्त्री -परिचरांच्या मानधनवाढी संदर्भात मा.सह संचालक, आरोग्य सेवा मुंबई ,यांनी सकारात्मक वस्तुनिष्ठ मानधन वाढीचा अहवाल व प्रस्ताव दि.१४-०६-२०२४ रोजी मंत्रीमंडळाकडे पाठविला आहे. परंतु सरकार कडून अद्यापही शासन निर्णय काढण्यात आलेला नाही.तेव्हा उपेक्षित महीलांना शासनाने न्याय द्यावा आणि मानधन वाढीचा शासन निर्णय काढण्यात यावा, अंशकालीन हे‌ नाव बदलन्यात यावे , त्यांना पेन्शन लागु करा, रजा सुट्या चा लाभ द्या , किमान वेतन रू. २१०००/- मानधन/वेतन देण्यात यावे, त्यांना प्रसुती रजा मंजूर करण्यात यावी, सेवा ज्येष्ठतेनुसार परिचर पदावर घेण्यात यावे, कर्तव्यावर मृत्यू आल्यास सहाय्यता निधी मंजूर करण्यात यावा, अर्धं वेळ कर्मचारी म्हणून संबोधले जात असले तरी प्रत्यक्षात त्या पुर्ण वेळ काम घेतल्या जातात मात्र मोबदला अत्य अल्प दिला जातो. त्यामुळे आरोग्य विभागाने अंशकालीन स्त्री-परिचरांना कर्मचारी दर्जा द्यावा, आरोग्य विभागात कायम करावे , इत्यादी मागण्यांना‌ घेऊन धरने आंदोलन करण्यात आले यावेळी कॉ.दिवाकर नागपुरे, विलास ससाने,
सिमा धवने , यशोदा झांबरे, संगीता म्हैसकर, रूख्मीना सुर्यवंशी, सुलोचना अन्नछत्रे, रंजना तायवाडे , शांताबाई राठोड , अल्का काळे, मुक्ता साबळे, गोदावरी काकडे, आशा कांबळे, कांता रोकडे, बेबीताई गायकवाड, कमल मेंडके, पंचाबाई‌ आस्वले, उषा शेंबळे,कमल वेले, आशा कांबळे, उमा शीरनाथ, निर्मला कोल्हे , रमाबाई शंभरकर ,वर्षा पीसे, रंजना ढोक,सुमीत्रा जमदाडे,अनुसया सोनकुसरे, कल्पना सवाईमुन, आशा ढबाले, मंगला धवसकर, मंदा कांबळे, अंजना बोंनसुले कुसुम टेकाम ,जनाबाई पळवेकर , पण्यरथा काष्टे , स्वरसथा गोलाईत ,शिला रोकडे, ज्योती राठोड, वर्षा तोडसाम ,मंगला लंबे, वैशाली निबर्ते , लताबाई सांगळे, वंदना मागुळकर, हंसमाला शेंडे, मीना रहीले, सुमीत्रा व्यवहारे, दुर्गा कोटनाके, जिजा रीगने, संगीता पीस्तुलकर ,गीता कुळमेथे , गंगु तोडसाम , मंदा राउत, यशोदा चव्हाण, अर्चना चिकटे, बेबी ठाकरे, शेवंता पवार आशा बोबडे , सोनाली कडुकार ,रमाबाई शंभरकर , मिरा वाघमारे , उषाताई राठोड, बेबी ठाकरे ,वंदना मागुळकर, अनुसया सोनकुसरे, संगिता वायदंडे, सुमित्रा जमदाळे , शशीकला भगत ,गंगू तोङसाम , सुनीता भस्मे. जयश्री मरापे, पर्वता दाते , वेनु कांबळे , रंजना ढोक ,धोङाबाई आगोशे , सायराबी शेख,धोडाबाई बल्लाळ , कविता राठोड ,अंजना सरकुडे ,मिना ठाकरे ,जमूना गंगावने, विद्या गिरोलकर, संगिता राठोड, कुसुम जोगदंडे, वंदना मागुळकर, लक्ष्मी मानतुटे, रंजना गायकवाड, छाया पडघाने, नंदा कांबळे, संगिता जाधव ,कमल कांबळे ,आशा बोबडे , सप्ताफुले कांबळे, ,प्रतिभा सुकळकर, सोनाली कुरडकार, लताबाई कांबळे, वर्षा पीसे, वंजेमाला राठोड, संगीता वायदंडे, सुभद्रा इंगळे , शोभा वावरे, , अंजना सरकुंडे, सायराबी शेख, शशीकला भगत, सोनाली सोनकार , मंगला धावसकर, कुसुम टेकाम, दुर्गा कोटनाके, दिपाली दातकळ , यशोदा चव्हाण, सरस्वती बोंबले, रेखा कनाके, कुसुम मानकर, जया शिंदे, संगीता राऊत, उषा शेंबळे, जिजाबाई रिंगने, आशाबाई बोबडे, विठाबाई डोलारकर, पारूबाई देशमुख, कुसुम कांबळे, लक्ष्मी बोके , प्रिती ठाकरे, कुसुम रोहणकर, लीला पवार, सुमनबाई कोरे , पदमीनी ठाकरे, सुरेखा पढाल, वनमाला किन्हीकर अंजना सरकुंडे,मयुरी भोयर, नंदा शेळके,साधना गवळी, जयश्री मरापे,बेंबी कांबळे, यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.