


मागील अनेक वर्षांपासून वरोरा शहरात येणाऱ्या हजारो जडवाहन धारकांकडून टोल घेणाऱ्या रोहन राजदीप इन्फ्रास्ट्रचर या कंपनीने टोल वसूल करण्याचा गोरखधंदा लावला आहे . वरोरा शहरात येणाऱ्या उडान पुलाच्या बांधकाम खर्चाची भरपाई करण्यासाठी मागील कित्येक वर्षांपासून वरोरा शहरात व शहरातून वणी मार्गे जाणाऱ्या जड वाहन धारकांकडून टोल वसुली सुरू आहे, परंतु टोल वसुली करतांना टोल कंपनीकडून ज्या मुलभूत सुविधा करायला हव्या त्या सुविधा मात्र कुठेच दिसतं नाही. प्रत्येक टोल नाक्यावर वाहनांनुसार टोल दराचे फलक स्पष्टपणे लावलेले असावेत, जेणेकरून प्रवाशांना दरांची माहिती सहज मिळेल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियमांनुसार, वाहने टोल नाक्यावर ३ मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबवता येणार नाहीत. जर जास्त वेळ लागला, तर प्रवाशांना टोल न घेता सोडले जाईल. टोल रस्त्यांवर अपघात किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास मदत करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक आणि आपत्कालीन सेवा ऍम्ब्युलन्स उपलब्ध असणे बंधनकारक आहे. परंतु या टोल नाक्यावर या सर्व सुविधा दिल्या जात नाही
कंपनीच्या टोल कडे जर एखादा अपघात झाला तर रुग्णवाहिका नाही, टोईंग गाडी नाही, पथ दिवे पूर्णतः सुरू नाही, रोडवर कुठल्याही प्रकरचे पट्टे नाही, रस्त्याच्या कडेचे पांढरे पट्टे पूर्णतः दिसेनासे झाले आहे. दिशाफलक तुटलेले आहे. रस्त्याची साफसफाई तर होतच नाही, पिण्याच्या पण्याची व्यवस्था नाही. नागपूर चंद्रपूर कडूं येनाऱ्या बस ला डेपो मधे जाण्याकारिता टोल वर स्पेस नाही, गाडी वळती करिता त्रास होत आहे, टोल वरील पुलाच्या सलाखी बाहेर निघाल्या आहे. लोक पुलाला रंगवूंन जहिरात करत आहे पण कंपनीचे लक्ष नाही, मुख्य प्रवेश चौकी ला डाव्या हाताल आय टी आय आहे , एसटी बस चा पण मार्ग तोच आहे, अतिक्रमण येवढे वाढले की , छोटे व्यवसायिक रस्त्यावर आले आहेत, माढेळी वरुण येनारी बस विरुद्ध बाजुने येते आहे इत्यादी समस्यांनी वेढलेला हा टोल नाका चुकीच्या पद्धतीने बनविण्यात आला असून टोल कपंनी व्यवस्थापन लक्ष न देता केवळ टोल वसुली करतं असल्याने हा बेकायदेशीर टोल नाका येणाऱ्या 15 दिवसात बंद करण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना या परिसरातील जड वाहन धारकांना न्याय देण्यासाठी मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे तालुकाध्यक्ष बाळू गेडाम यांनी दिला आहे .निवेदन देते वेळी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन आंदेवार , महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष राजुभाऊ कुकडे तसेच अनेक मनसे सैनिक उपस्थित होते.यासंदर्भात निवेदन प्रतिलिपी सार्वजनिक बांधकाम मंत्री, परिवहन मंत्री ,जिल्हाधिकारी चंद्रपूर. , अध्यक्ष अभियंता ,सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर , उपविभागीय अधिकारी वरोरा यांना देण्यात आले .
बस चालकाला करावी लागत आहे चुकीच्या दिशेने वाहतूक
वरोरा शहरातील मुख्य भागात टोल नाका असल्याने बस फिरविण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने. बस चालकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.बस स्टँड वर पोहचण्यासाठी विरूद्ध दिशेने वाहतूक करावी लागत असल्याने बरेचदा या भागात वाहतूक कोंडी चा सामना सामन्य नागरिकांना करावा लागत आहे.हा टोल नाका चुकीच्या पद्धतीने उभारण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
