
सहसंपादक : रामभाऊ भोयर
आधुनिक काळात वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून समाजाला सगळे जागृत करत परिवर्तनवादी समाज घडविण्यासाठी महान कार्य करणारे क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांनी गो धन पाळत (लदळी) मीठ,साखर व अन्नधान्याचा व्यापार करत समाजाला स्वाभिमानी बनवत “चोरी चपारी करो मत , केनी भज पुजो मत, स्वतः र जीळेम स्वतःच वजाळो कर सकोचो” असा स्वाभिमानी संदेश देत बंजारा समाजाला कष्ट करण्याचे उपदेश देऊन वैज्ञानिक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवत समाजाला जागृत करण्याचे महान कार्य केले.त्या क्रांतिकारी कुलदैवत संत सेवालाल महाराज यांची 287वी जयंती दिनांक 15 फेब्रुवारीला आहे. तेव्हा कळंब तालुक्यातील ताड्या तांड्यात मोठ्या उत्सवाने साजरी करून संत सेवालाल महाराजाचे आचार विचाराची पेरणी करत संतव सेवालाल महाराजांना अभिप्रेत तांडा निर्मिती करून जयंती उत्सव साजरी करण्याचे आवाहन कळंब येथील पत्रकार संरक्षण समिती कळंब तालुका अध्यक्ष विरेंद्र चव्हाण यांनी केले आहे बंजारा समाजाचे कुळदैवत संत सेवालाल महाराज यांची 287 जयंती दिनांक 15 फेब्रुवारीला होणार असून संत सेवालाल महाराज जयंती म्हणजे बंजारा समाजाची दिवाळी आहे.तरी तमाम माझ्या सर्व बंजारा बांधवांनी प्रत्येक तांड्यात घरोघरी दिवे व घरावर पांढरा ध्वज लावून संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात दिवाळी सारखी साजरी करावी असे आव्हानपत्रकार संरक्षण समिती कळंब तालुका अध्यक्ष विरेंद्र चव्हाण यांनी करत समाजातील युवकांना व्यवसायिक शिक्षणावर भर देत संत सेवालाल महाराज यांनी म्हटल्या “प्रमाणे रुपीया कठोर पाणी वकीय, रपीयिर तेर चळा वकीय “आज महाराजांचे बोल तंतोतंत खरे ठरत असून तेव्हा व्यावसायिक शिक्षण महाराजांना अभिप्रेत होते या जयंती उत्सवात व्यसनापासून व्यसनापासून दूर राहण्याची संकल्प समाज बांधवांनी घेण्याची आव्हान मार्कडा येथील विरेंद्र चव्हाण यांनी केले आहे
