
सरपंच अक्षय मेश्राम, कुंदन कुडमथे यांनी केले स्वागत
मोहदा :-अतिमागास असलेल्या कोलाम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पायदळ लाँग मार्चचा मोहदा येथे सरपंच अक्षय मेश्राम व कुंदन भाऊ कुडमथे यांच्या कडून भव्य स्वागतस्वागत करण्यात आले,सम्पूर्ण मोर्चेकारी यांना नास्ता, चहा देण्यात आला यावेळी अतुलआत्राम यांनी चालत्या सभेला सबोधित केले ‘शामदादा कोलाम स्वतंत्र अभ्यास आयोग’ तातडीने स्थापन करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी दिनांक २० मार्च २०२६ रोजीनिघालेल्या पांढरकवडा ते यवतमाळ असा ऐतिहासिक ‘पायदळ लाँग मार्चचा आगमन मोहदा या नगरीत दि. 21मार्च रोजी 12.00वाजता आगमन झाले आहे.प्रदेशाध्यक्षा सौ. इंदिराताई बोंदरे आणि कोलाम समाजाचे युवा नेते अतुल आत्राम व राहुल चिचघाटे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला असून, पांढरकवडा येथून निवालेला हा जनसागर यवतमाळ
येथील पालकमंत्री संजय राठोड यांच्या निवासस्थानावर धडकणार आहे.
शामादादा कोलाम ब्रिगेड कोलाम जमात संवाद कार्यक्रम
प्रमुखमागण्या पुढील प्रमाणे आहे १. कोलाम समाजाच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास करण्यासाठी ‘शामदादा कोलाम स्वतंत्र अभ्यास आयोग’ स्थापन करावा.मागण्याः२. कोलाम कोलाम बांधवांना मूलभूत सोयीसुविधा आणि घटनात्मक आरक्षणाचे लाभ प्रभावीपणे मिळावेत. ३. समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या विशेष संधी उपलब्ध करून द्याव्यात. या लाँग मार्चमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील हजारो कोलाम बांधव, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. जोपर्यंत सरकार आमचे प्रश्न गांभीर्यान सोडवत नाही आणि आयोगाची अधिकृत घोषणा करत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असा निर्धार अतुल आत्राम व मोहदा ग्रामवासी यांचे आभार सौ. इंदिरा बोंदरे यांनी आपल्या कोलामी भाषेत केले यावेळी राहुल चिचघाटे व परिसरातीलकोलाम समाज बांधव उपस्थित होते.
