मराठा आरक्षण लवकरात लवकर बहाल करा.. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड

लता फाळके /हदगाव

माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मराठा आरक्षण रद्द च्या निर्णय अनुषंगाने आज हदगाव येथील स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य व केंद्र सरकारच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले आणि हदगाव तहसील येथे निवेदन देण्यात आले..
मराठा आरक्षण न्यायालयात असताना राज्य सरकारने व केंद्र सरकारने संबंधित विषयाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्यामुळे आज मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले आहे.
यास संपूर्ण जबाबदार महाराष्ट्रातील राज्यकर्ते महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार आहे या दोन्ही सरकारने मराठा समाजाचा विश्वास घात केला अशा आशयाचे निवेदन स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व सकल मराठा समाजाच्या वतीने हदगाव तहसील येथे देण्यात आले. या मराठा समाजाच्या लढ्यास नाना भाऊ पटोले  युवा मंच चे तालुका अध्यक्ष गजानन दळवी यांनी पाठिंबा दिला.
निवेदन देताना स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड चे प्रदेश संयोजक (अ. आ.) तथा विदर्भ संपर्क प्रमुख शिवाजी जाधव नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख बालाजी कराळे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष संदीप आढाव हदगाव तालुका कार्याध्यक्ष विश्वजीत पवार हदगाव तालुका उपाध्यक्ष गजानन सोळंके मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष साईनाथ सूर्यवंशी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पवन पाटील मोरे. पमु पा.वानखेडे. सुरेश पाटील. सोशल मीडिया तालुकाध्यक्ष शंकर पाटील एम जे पाटील. अमोल पाटील कदम. अमोल वानखेडे. आकाश गोदले. माधव वानखेडे. देवानंद पा. ता. सं. ता. सरचिटणीस गजानन पाटील कोल्हे.हदगाव शहराध्यक्ष अक्षय भाऊ. रुई सर्कल अध्यक्ष संदीप गिरी. कृष्णा पाटील व असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.