पाणीपुरवठा सुरळीत करा: एकता प्रतिष्ठान हिंगणघाट द्वारे देण्यात आले निवेदन.

प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, हिंगणघाट


आज दिनांक २७ में २०२१ रोजी नगरपालिका हिंगणघाट कडे मागणी करुन चंद्रकांत पाटील साहेबांना याबाबत निवेदन सादर करण्यात आले.. मागिल काही दिवसांपासून ते आतापर्यंत प्रभाग क्रमांक ०६ (आदर्श नगर, प्रज्ञा नगर, संतक्रुपा नगर) मधे पाण्याची अत्यंत वाईट भिषण परिस्थिती आहे, लोकांना पीण्याच्या पाण्यासाठी दरबदर भटकंती करावी लागत आहे, यामध्ये नगर पालिका प्रशासन कडुन अद्यापही काहीच मदत मिळाली नाही, प्रभागातील नगर सेवकांकडे याबाबत तक्रार केल्यास, मुख्याधिकारींना जाब विचारा अशें उत्तर दिल्या जाते , मग जनतेनी अपेक्षा तरी कुणाकडून करावी पाण्यावर कर घेनारी नगरपालिका कडुन की जनतेने नीवडुन दीलेल्या लोकप्रतिनीधी कडुन.?
मानवी जीवनात पाण्याविना काहीच शक्य नाही.
दरवर्षी प्रमाणे यंदा ही नगर पालिका प्रशासन प्रभाग क्रमांक ०६ वर दुर्लक्ष करत आहे असं स्पष्टपणे दिसून येते आहे, उन्हाच्या तडाख्याने लोकांच्या विहीरी आटल्या असुन नळाला सुद्धा पाणी येईना, आम्ही तुम्हाला आमच्या हक्काचं पाणी मागतोय ते तुम्ही कसल्याही परिस्थितीत उपलब्ध करुन द्यावे ,
अन्यथा नाईलाजाने प्रभागातील जनतेला घागर घेऊन नगरपालिकेची वाट धरुन एक मोठ आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा एकता प्रतिष्ठान हिंगणघाट च्या वतीने देण्यात आला, निवेदन सादर करताना एकता प्रतिष्ठान प्रमुख अखिल धाबर्डे, भाऊराव कोटकर, सुनील दीवे, प्रविण शंभरकर, प्रफुल क्षिरसागर, प्रतिक वासेकर, संदेश थुल, शैलेश चांदुरकर, प्रज्वल गायकवाड, अमीत कांबळे, अजीत कांबळे, रोहीत कांबळे, चेतन घुसे, अंकीत मुन, शुभम बंसोड इत्यादी उपस्थित होते..