

प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, हिंगणघाट
कामगार नेते डाॅ उमेश वावरे यानच्या नेतृत्वात मोहता मिल कामगारा सोबत उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यानच्या कार्यालयात धडक मोर्चा काडन्यात आला व निवेदन देवून चर्चा करण्यात आली .
सदर कंपनी 135 वर्षं जुनी असुन हिंगणघाट व ग्रामीण भागातील संपूर्ण उदरनिर्वाह त्या कंपनीवर अवलंबून आहे. कंपनी सचालकानी अचानक मिल बंद केल्यामुळे कामगार वर उपासमारी चि वेळ आली आहे. अनेक कामगाराचे वय हे 30ते 40 च्या दरम्यान असुन रोजगाराच्या पेचप्रसंग निर्माण झाला आहे. मागील अनेक महिण्याचे वेतन कामगाराना मिळाले नाही.जर संचालक मंडळास गिरणी बंद करावयाची असेल तर संपूर्ण कामगाराना कंपनी अक्ट नुसार व्हीआरस देण्यात यावे.
व प्रोत्साहन 10 लाख देण्यात यावे.
त्यानचा हक्काचा पैसा देण्यात यावा अन्यथा कामगारा समोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही..जर एखादा कामगाराने आर्थिक विवंचने पाही आत्महत्या केली याची जबाबदारी कोण घेणार. अश्या प्रसंगी स्वतः मिलमालकास जबाबदार धरून व त्यानचा वर 302 नुसार गुन्हा करावा का? सदर मिलाची सोसायटी असून त्या सोसाटिचे रक्कम 36 लाख रूपये मिलमालकांकडे अजूननही जमा आहे तो सोसाटि कडे जमा करण्यात यावे ईएसआय चि रक्कम मिलमालकाने भरली नसल्यामुळे कामगाराना ईएसआय चे लाभ मिळणे बंद आहे , त्वरित मिलमालकाकडून ईएसआय च्या रक्कम भरण्यात यावी जर 8 दिवसात मागणी मान्य नाही झाली तर या पेक्षा तिव्र आदोलन ईशारा देण्यात आला,
निवेदन देताना. दिलीप कहूरके. मनिष कांबळे. राजेश खानकूरे. प्रदीप माणिकपुरे.विलास ढोबळे .देवरावभाऊ साबळे.अरूण काळे. गुलाबराव पिपळशेंडे. अनिल तादूळकर. रत्नाकर कुंभारे. मधुकर जागडे.नितिन कानकाटे जिवन उरकुडे .व अन्य मिल कामगार व महिला
उपस्थित होते..
