
दुर्गापूर, उर्जानगर व लगतच्या परिसरात होत असलेल्या वाघांच्या हल्ल्यात सतत सर्वसामान्य नागरिकांचा जीव जात असल्याने वन विभागाच्या निष्क्रिय कार्यप्रणालीच्या विरोधात आमरण आंदोलनाची सुरुवात नितीन भटारकर यांनी काल पासुन केली आहे. सदर ज्वलंत विषया संदर्भात या उपोषणाला आज अनेक संघटनांनी आपला पाठिंबा देऊन जाहीर समर्थन दिले.
आज दुर्गापूर ग्रामपंचायतच्या सरपंचां सौ पूजाताई मानकर, उपसरपंच प्रज्योत भाऊ पुणेकर, माजी सरपंच सुजित भाऊ नळे, माजी सरपंच अमोल भाऊ ठाकरे, माजी उपसरपंच आसिफ भाई खान, ग्रामपंचायत सदस्य सारंग भाऊ वाकोडे, सुमेघ भाऊ मेश्राम, जॉन्सन भाऊ नळे, सचिन भाऊ मांदाळे, निखिल भाऊ हस्ते सौ. वर्षा ताई रत्नपारखी यांनी पत्र देऊन समर्थन जाहीर केले.
तसेच सोबत ऊर्जानगर ग्रामपंचायतच्या सरपंचा सौ. मनीषाताई येरगुडे, उपसरपंच अंकित भाऊ चिकटे, ग्रामपंचायत सदस्य मा. राजूभाऊ डोमकावळे, सागर भाऊ तुरक, अनुकुल भाऊ खन्नाळे, सौ. मनिषताई इरपाते, सौ. सारिकाताई कावळे, सौ. राजश्री ताई आवळे, लोकेश भाऊ कोटरंगे हे सुध्दा सर्व सदस्यांसह उपोषणास्थळी येऊन समर्थन पत्र दिले असल्याने यामुळे या आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे.
