[बाप्पा संकटमोचक ] शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविणासाठी प्रत्यक्ष देवबाप्पा आले [राळेगावच्या न्यू बाल गणेश उत्सव मंडळाच्या देखाव्यातून सामाजिक संदेश]

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

यवतमाळ जिल्हा महाराष्ट्रमध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून सुपरिचित आहे. अशातच यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जवळपास 40 हजार हेक्टरवर शेतपिकांचे नुकसान झाले. घेतलेले बँकांचे व सावकाराचे कर्ज कसे फेडावे या वीवंचनेत आत्महत्या करण्यासारखे पाऊल उचलू लागला. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी शेतकऱ्यांची मुलेच पुढे आली असून आपल्या न्यू बाल गणेश उत्सव मंडळाच्या देखाव्यातून प्रत्यक्ष देवबाप्पा जमिनीवर येऊन शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करीत असल्याचा देखावा उभारला आहे. संकट आणि शेतकरी हे जरी समीकरण असले तरी संकटे येतात आणि जातात मात्र शेतकऱ्यांनी आपला धीर सोडू नये. यासाठी प्रत्यक्षात गणपती बाप्पा शेतकऱ्यांचे पाय पकडून गळफास वा आत्महत्या करू नये देवबाप्पा आपल्या पाठीशी आहे ते मदतीला धावून आले आहे. असा समस्त शेतकऱ्यांना संदेश देण्यासाठी हा देखावा उभारण्यात आला आहे. या मंडळात केवळ 20 वर्षाआतील सर्व शेतकऱ्यांची मुले असून त्यांच्या सामाजिक आणि मानवतावादी संदेशातून भविष्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनेक अनुचित घटनेला निश्चितच आळा बसणार हे निश्चित