
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद, गृहविभाग, आरोग्य विभाग, एम.आय.डी.सी. यासह सर्वच विभागामध्ये भरती प्रक्रिया तत्काळ राबवावी. अशी मागणी संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांच्या नेतृत्वात येथिल उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
त्याच प्रमाणे पोलीस भरती मध्ये एन.सी.सी. प्रमाणपत्र मार्क चे आरक्षण ठेवण्याचा घेण्यात आलेला निर्णय त्वरित रद्द करावा. अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, ऐड.अमोल टोंगे, दत्ता डोहे, लिकेश चेंदे, ऋषी बोरूले, कपिल गोहोकर, मोहनिष मालेकर, विशाल चीडे, राहुल बिडकर, अरुण धानोरकर, शंकर निब्रड, सचिन टोंगे, केतन मोहरे, मदन निखाडे, नयन मडावी यांसह अनेक परिक्षर्ती उपस्थित होते.
