
वणी :नितेश ताजणे
निकृष्ट बियाणे, औषधे, खतांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाने सतर्क राहून आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश असतानाही वणी उपविभागात राज्याच्या सिमावर्ती असलेल्या आंध्रातुन बि- बियाणे व बोगस औषधे सर्रासपणे येत असल्याने शेतकऱ्यांची मोठ्याप्रमाणात फसवणूक होत आहे. मात्र याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष का होत आहे हा संशोधनाचा विषय आहे.
कृषी विभागाने सातत्याने बीजोत्पादन, खतनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या संपर्कात राहून त्यांना शासनाच्या निर्देशानुसार बियाणे, खते वितरणाबाबत सूचित करावे. बियाणे, खतांची विक्री चढ्या दराने होऊ नये, यासाठी खबरदारी घ्यावी. तसेच कृषी विभागाच्या भरारी पथकांच्या माध्यमातून बियाणे, खतांची गुणवत्ता तपासावी. बाहेर राज्यातुन येणाऱ्या बोगस औषधे- बि- बियाणे यावर आळा घालण्यासाठी कृषी विभागाचे वतिने उपाययोजना करण्याची गरज असताना मात्र थातुरमातुर कारवाई करुन कागदी घोडे नाचवत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी आधिच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. याकडे कृषी विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
