भटाळी गावातील पुलियाचे कामआणि भटाळी गावातील रस्त्याचे काम 7 दिवसात सुरू करा अन्यथा नदी पात्रात जल आंदोलन


ग्राप. सदस्य विकास पेंद्राम , सा.का.सचिन उपरे यांचा इशारा


चंद्रपूर:भटाळी गावाजवळून वाहणार्‍या ईरई नदीवरील पुलाचे व मुख्य रस्त्याचे बंद असलेले काम त्वरित सुरू करण्यात यावे. मागील काही वर्षांपासून भटाळी पूलीयाचे काम कासव गतीने सुरू आहे. आता तर पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे ज्या पुलाचे बांधकाम सुरू नाही त्याच नदी पात्राच्या मधोमध जल आंदोलन केले जाणार असे निवेदन दिनांक ११/११/२०२२ ला, गट ग्रा पं पायली भटाडी चे सदस्य श्री विकास पेंदराम तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री सचिन उपरे यांनी मा. कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग क्रमांक -१, तहसील जिल्हा चंद्रपूर येथे आपल्या निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे. या पुलिया चे काम कासव गतीने किंवा थांबलेल्या कामामुळे अनेक लोक या नदिपात्रात वाहून गेले त्यामुळे या पुलियाचे लवकरात काम सुरू करा तसेच भटाळी येथील मुख्य रस्त्याचे सुद्धा अर्धवट काम पूर्ण करणे तसेच इरई नदीवरील पुलाचे बांधकाम ७ दिवसांत सूरू केले नाही तर जल आंदोलनादवारे सत्याग्रह करण्यात येणार असल्याचे निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.आणि त्यांनी लवकरात लवकर आम्ही काम सुरू करू अशी माहिती आम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी दिली .