
सहसंपादक -रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर येथे गेल्या काही दिवसांपासून जनावरांच्या शरीरावर गाठी येण्याचा प्रकार सुरू झाला असून हा गाठी येण्याचा प्रकार म्हणजे लंपी आजार असल्याची भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली असून अगोदर अतिवृष्टीमुळे पिकाची टक्केवारी कमी, त्यातल्या त्यात शेतमालाला समाधानकारक भाव नाही त्यामुळे शेतकरी अगोदरच द्धिद्धामनस्थितीत आणि अशातच शेतकऱ्यांच्या जनावरांना अशा रोगाची लक्षणे लागल्यामुळे यामुळे अशा प्रकारे अनेक जनावरांना लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.करीता अगोदरच या गावात जनावरांना प्रतिबंधात्मक लस टोचून जनावरांना या रोगापासून संरक्षण देण्यात यावे.अशी मागणी वसंत जिनिंगचे संचालक तथा ग्राम पंचायत सदस्य रामधन राठोड, खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावनसिंग वडते,ग्राम पंचायत सदस्य भानुदास चव्हाण, ग्राम पंचायत सदस्या ज्योत्स्ना उईके, गजानन ठाकरे, पुंडलिक आत्राम,पुनेश्वर उईके,किरण निमट,दशरथ भोरे, प्रविण भोरे,राहूल भोरे, सदानंद भोरे,जनार्धन कडू, प्रशांत भोरे, शंकर मेश्राम, उत्तम मेश्राम,विजय खैरे, इत्यादी शेतकऱ्यांनी केली आहे.
