ती उज्वला गेली चुलीवर,सर्व सामान्य गोरगरिबांचे हाल

सहसंपादक- रामभाऊ भोयर

केंद्र सरकारच्या ‘ उज्ज्वला गॅस योजनेमुळे गोरगरीबांच्या घरात गॅस सिलिंडर शेगडी पोहोचली आणि चुलींवरील स्वयंपाकाच्या धूरामुळे होणाऱ्या आरोग्यबाधेपासून त्यांचा बचाव झाला. गृहिणी खऱ्या अर्थाने ‘ उज्ज्वला ठरल्या होत्या मात्र आता या योजनेअंतर्गत गॅस सिलिंडरचा कोटा पूर्ण झाला आणि मिळणारी सबसिडीही बंद बंद झाली येतो ती ४० रू. आता हाच गॅस सिलिंडर १२०० रुपयांपर्यंत खरेदी करण्याची वेळ आल्याने गोरगरीबांच्या आवाक्याबाहेर गेला आहे . त्यामुळे पुन्हा एकदा या उज्ज्वलांना चुलीवर परतावे लागले आहे आणि त्यांचे चेहरे त्यांचे आरोग्य धुरामुळे पुन्हा जैसे थे २० वर्ष पुर्वी तशी अवस्था झाली आहे.उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ ग्रामीण भागात शंभर टक्के घेतला गेला . त्यामुळे घरोघरी चुली जाऊन गॅस शेगड्या आल्या एका अर्थाने चुली नामशेष झाल्या आहेत . मात्र आता या योजनेअंतर्गत मिळणारी सबसिडी बंद झाली आणि सिलिंडरसाठी १२०० रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागत असल्याने गोरगरिबांना ते न परवडणारे झाले आहे.आता पुन्हा गावातील महिला जंगलात सरपण गोळा करायला निघत असल्याचे दिसून येते चुलीवरच्या धुराचा फटका सर्वाधिक गृहिणींना बसतो . त्यामुळे ग्रामीण भागात महिलांना स्वाश,डोळ्याचे , फुफ्फुसाचे आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतात . सरकारच्या योजनेमुळे गृहिणींची मुक्ती झाली खरी मात्र ती औटघटकेचीच ठरली आहे.ग्रामीणांची स्थिती ‘ अघात ना मधात
ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी केरोसीनचा वापर केला जात होता. ते देखील कायमचे बंद झाले आहे.जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेले तर वन्यप्राण्यांचा धोका आणि मोडी आणल्या तर अवैध वृक्षतोडीचा गुन्हा.अशा ‘ इकडे आड तिकडे विहीर ‘ पेचप्रसंगात ग्रामीण अडकले आहेत.गॅस सिलिंडरचे दर सातत्याने वाढत असल्याने ग्रामीण आता ‘ ना अधात ना मधात ‘ असे झाले आहेत . ग्रामीण भागात शेतकरी, मजुर, सर्व सामान्य नागरिक असतात. त्यांना प्रधानमंत्री उज्वला आपले उज्वल घर होणार ही अपेक्षा होती परंतु झाले उलट. शासननाने बस प्रवास ५० टक्के दिली तिच उज्वला ला दिली असती तर. सर्व सामान्य परिवार उज्वल झाले असते. अशी अपेक्षा सर्व सामान्य नागरिक करीत आहेत.