
सहसंपादक:- रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यात घाट लिलाव न झालेल्या घाटावर रेती तस्करांचा डेरा असून, राळेगाव तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीचे पात्र रेती तस्करांनी अक्षरक्ष: पोखरून काढले आहे. नदीपात्रात ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडले असून, नदीचा प्रवाहही थांबला आहे. हा प्रकार खुलेआम सुरू असताना पर्यावरण रक्षणासाठी कुणीही पुढे येताना दिसत नाही. राळेगाव तालुक्यात वर्धा नदी ही तालुक्यातील मोठी नदी असून, पात्र विस्तीर्ण आहे. उच्च दर्जाच्या चांगल्या रेतीसाठी वर्धा नदी प्रसिद्ध आहे. अशा या वर्धा नदीवरील रेतीघाटांचा दोन वर्षांपासून लिलावच झाला नाही. अहोरात्र तस्कर रेतीचा उपसा करीत आहेत. वर्धा नदीपात्रात मोठाले खड्डे करून रेतीचा उपसा केला जातो. लिलाव झाल्या नसल्याने या घाटावर महसूल विभागाचे नियंत्रण आहे. परंतु, अर्थपूर्ण व्यवहारामुळे कुणीही मोठी कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे राजरोस रेतीचा उपसा केला जातो.
तालुक्यातील घाटांवर खुलेआम रेती तस्करी केली जात आहे. गत दोन वर्षांपासून रेतीची मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जाते. हा सर्व प्रकार दिवसा ढवळ्या सुरू असते. परंतु महसूल विभागाचे अधिकारी थातूरमातूर कारवाई करतात. यामुळे तस्करांचे मनोबल वाढले आहेत. रस्त्यात ठिकठिकाणी तस्करांचे मानसे पेरलेली असतात. अधिकाऱ्यांचे वाहन जाताना दिसले की तात्काळ सूचना दिली जाते. त्यामुळे वाहन रस्ता बदलून दुसऱ्या मार्गाने जाते. या सर्व प्रकारात महसूल विभाग आणि तेवढेच जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे.
वसुंधरा बचाव अभियान कागदावरच- शासनाने पर्यावरण रक्षणासाठी वसुंधरा बचाव अभियान सुरू केले आहे. सायकल माध्यमातून विक्रम करीत वसुंधरा बचाव अभियान राबविण्यात आले. संपूर्ण प्रशासन या राबले; परंतु त्याचवेळी जिल्ह्याच्या विविध घाटांतून रेतीचे उत्खनन होत होते. एकीकडे पर्यावरण बचावासाठी अभियान राबवायचे, तर दुसरीकडे रेती तस्करांना खुली सूट द्यायची, असा प्रकार जिल्ह्यात सुरू आहे.
संघटित रेती तस्करांकडून चोरी- तालुक्यात रेती तस्करांच्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत. संघटितपणे रेतीचे राजरोसपणे उत्खनन करतात. खुलेआम नेहमी वाहनातून रेतीची वाहतूक केली जाते. रेती तस्करांना कुणाचेही भय दिसत नाही. महसूल प्रशासन केव्हा तरी थातुरमातुर कारवाई करते; परंतु इकडे कारवाई सुरू असताना दुसरीकडे राजरोस रेतीचा उपसा सुरू असतो.
कोट्यवधींची उलाढाल- राळेगाव तालुक्यातील रेती गुणवत्तापूर्ण आहे. तिला तालुक्यात मोठी मागणी आहे. या व्यवसायात दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. आतापर्यंत कायमस्वरूपी तस्करांच्या मुसक्या कुणीही आवळल्या नाहीत. राजकीय प्रवाहाने ही तस्करी सुरू असते. तस्करांचे नेटवर्क एवढे मोठे आहे की, कोणता अधिकारी कुठे जाणार याची माहिती तस्करांना असते. यात काही राजकीय वेक्तीचा सुध्दा समावेश आहे.
