डोळ्यांचा फ्लू आला नागरिकांनी आरोग्य सांभाळा : डॉ चंदन पांडे यांचे नागरीकाना आव्हान

महागाव प्रतिनिधी :- संजय जाधव


पावसाळा आला की अनेक आजाराची लागण होते पावसाळ्यामध्येच हे आजार वाढीस लागतात जसे की, सर्दी, ताप, हिवताप, मलेरिया, डेंगू, टायफाईड, इत्यादी आजार प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये जोर धरताना दिसतात किंवा वाढीस लागतात, त्याचप्रमाणे आजच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यात तालुक्यामध्ये व स्थानिक गाव आजू-बाजूच्या खेड्यामध्ये
डोळ्यांचा फ्लू या आजाराची लागण झाल्याचे फार मोठ्या प्रमाणात लक्षणे दिसत आहेत. नागरिकांनी मुळीच घावरून जाऊ नये, घरातील ज्या व्यक्तींना, डोळ्याची लागण झाली आहे त्या व्यक्तीने इतर व्यक्तीपासून दूर राहावे, त्या व्यक्तीने डोळ्याला काळा चष्मा लावावा, डोळ्याला हात लावू नये, किंवा चोळू नये, डोळ्याची लागण झालेल्या व्यक्ती वापरत असलेले रुमाल, टावेल, बेडशीट, साबण इतरांनी ते वापरू नये त्यापासून संसर्ग होण्याची जास्त शक्यता आहे. असे आव्हान डॉ चंदन पांडे यांनी नागरिकांना केलेला आहे