
प्रतिनिधी :- संजय जाधव
रोहयो कामाच्या प्राधान्यक्रम प्रतिक्षा याद्या तयार करण्यासाठी जिल्ह्यात विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहे. ग्रामसभेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्विकारण्यात येत आहे. उमरखेड पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखालीपंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध घटकांसाठी लाभार्थी निवडण्याकरीता या विशेष ग्रामसभा घेण्यात येत आहे. आज टाकळी ईसापुर येथे विशेष ग्रामसभेस श्री. जय राठोड व टाकळी ग्रामपंचायतचे सचिव प्रवीण कदम यांनी उपस्थित राहून रोहयोंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरुन प्रामुख्याने वैयक्तिक सिंचन विहिरी, जनावरांचा गोठा, कुक्कुटपालन शेड, बांबू लागवड, फळबाग लागवड, मोहगणी वृक्ष लागवड, तुती लागवड,
वैयक्तिक शेततळे, ढाळीचे बांध, शेत सपाटीकरण विहीर पुनर्भरण, जलतारा या कामाच्या प्राधान्यक्रम बाबत मार्गदर्शन केले. रोहयोच्या विविध घटकांसाठीलाभार्थ्यांची यादी एकाचवेळी तयार करण्यात येणार असल्याने त्याबाबत नागकरीकांना प्राधान्यक्रम याद्याचे महत्व पटवून दिले. विशेष ग्रामसभेमध्ये शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत नागरीकांना मार्गदर्शन करण्यात आले. अंगणवाडी सेविका
यांनी स्वतः महिलांकडून योजनेचे अर्ज भरुन घेतले. याकरीता महिलांनाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शासनाचे नारी शक्ती दूत अँप कार्यान्वित झाले असून यावर महिलांना सदर योजनेकरीता अर्ज सादर करता येणार आहे. सदर प्रक्रिया संपुर्ण विनामुल्य आहे. अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत येथे योजनेचे अर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत निर्देश देण्यात आले. योजनेबाबत बचतगटाच्या सहयोगीनी, सीआरपी आणि वरिष्ठ अधिकारी यांना गावपातळीवर मार्गदर्शन करण्याबाबतमार्गदर्शन केले या विशेष ग्रामसभेला टाकळी येथील सरपंच सुषमा बाळू चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती
या विशेष ग्रामसभेला टाकळी येथील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ICRP बेबीबाई राठोड कृषी सखी उज्वला हाके पशु सखी किरण जाधव पशु सखी संगीता जाधव ईसापुर येथील ICRP वैशाली चव्हाण व नागरिक उपस्थित होते
